राजेश्वर ठाकरे

नागपूर : रेल्वेगाडय़ा नियोजित वेळेत चालाव्या यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाब असला तरी लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा कित्येक तास विलंबाने धावताना दिसतात. या विलंबाला अतिवृष्टी, धुके अशा नैसर्गिक कारणांचे प्रमाण केवळ ४० टक्के आहे. याउलट गाडीला विलंब होण्याच्या ६० टक्के प्रकरणांमध्ये तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर या विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांचा अभ्यास करून विलंबाची कारणे शोधली आहेत.

Vande Bharat Express Success or Failure Why are some Vande Bharat lying in the dust
विश्लेषण : वंदे भारत एक्सप्रेस यशस्वी की अयशस्वी? काही वंदे भारत धूळखात का पडून आहेत?
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
appeal to chief minister to reduce parking charges near uran to kharkopar railway stations
वाहनतळ शुल्कवाढीमुळे प्रवाशांचा संताप; उरण ते खारकोपर रेल्वे स्थानकांलगतच्या वाहनतळाचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Criticism of the bmc on social media due to the high level of asphalt on the sea coast road causing problems to motorists Mumbai news
सागरी किनारा मार्गावर डांबराच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना त्रास; समाजमाध्यमांवरून पालिकेवर टीका
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान

मध्य रेल्वेने १ एप्रिल २०२३ ते १२ जुलै २०२३ या कालावधीत एकूण ३७ हजार ४० मेल, एक्स्प्रेस गाडय़ा चालवल्या. तसेच या कालावधीत दररोज १ हजार ८१० उपनगरीय रेल्वेगाडय़ा धावल्या. या काळात मेल, एक्स्प्रेस गाडय़ांचा वक्तशीरपणा ८५ टक्के आणि उपनगरीय गाडय़ांचा वक्तशीरपणा ९५ टक्के होता.  विलंबाची कारणे शोधताना बाह्य घटक आणि तांत्रिक बिघाड अशी वर्गवारी करण्यात आली. इलेक्ट्रिक आणि डिझेल लोकोमध्ये बिघाड होणे, ईएमयू रॅक्सच्या युनिटमध्ये दोष असणे, रुळांमध्ये दोष असणे आणि सिग्नल यंत्रणा नीट काम न करणे आदी तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाडय़ांना सर्वाधिक उशीर झाला. १ एप्रिल ते १२ जुलै २०२२ च्या तुलनेत, चालू वर्षांच्या १ एप्रिल ते १२ जुलै २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडांमध्ये २७.५७ टक्क्यांनी घट झाली आहे. -शिवराज मानसपूरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.