यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील सुकळी (न) येथे एका १४ वर्षांच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या एका घटनेत वणी येथे एका १४ महिन्यांच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी घडलेल्या या दोन्ही घटनांनी हळहळ व्यक्त होत आहे.

सुकळी (न.) येथील वैभव विजय जाधव (१४) या मुलाने गावानजीक झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैभव यावर्षी आठव्या वर्गात गेला होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, लहान भाऊ, बहीण आहे. आईवडील मजुरी करतात. वैभव शुक्रवारी संध्याकाळी घराजवळ बांधलेली म्हैस आणण्यासाठी गेला. मात्र परत आलाच नाही. कुटुंबियांनी गावकऱ्यांच्या मदतीने रात्रभर शोध घेतला. शनिवारी गावाजवळील विद्युत सबस्टेशनजवळ नाल्यालगत निंबाच्या झाडाला वैभव दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचे कारण कळले नाही.

nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सिमेंट मिक्सरने १० वर्षांच्या विद्यार्थिनीला चिरडले, अपघातात भाऊही जखमी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
12-year-old girl diagnosed with Guillain-Barre syndrome
‘जीबीएस’ची चंद्रपूर जिल्ह्यात धडक, १२ वर्षीय मुलीला लागण; आरोग्य यंत्रणेकडून लपवाछपवी
2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Student Suicide, Online Game, German Language Suicide note ,
‘ऑनलाईन गेम’च्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या, दोनदा प्रयत्न फसले, जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ अन्…
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?

हेही वाचा – गडचिरोली : हत्तीची छेड काढणे तरुणांच्या अंगलट, पाहा व्हिडीओ

खेळत असताना बालकाचा पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू झाला. वणी शहरातील प्रगतीनगर भागात ही घटना घडली. रियांश शंकर गिलबिले (१४ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. शनिवारी त्याचे आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी रियांश आणि त्याची आजी असे दोघेच घरी होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास आजीने रियांशला घरात सोडले व ती आंघोळीला निघून गेली. याचवेळी रियांश घराबाहेर आला. खेळत खेळत तो पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचला व पाण्याच्या टाक्यात पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजी आंघोळ करून परत आल्यानंतर रियांश पाण्याच्या टाक्यात पडून असल्याचे आढळले. त्याला तत्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Story img Loader