अकोला : कर्जफेडीच्या विवंचनेतून अकोट तालुक्यातील उमरा येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. शैलेंद्र चंद्रशेखर तोमर (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा – ‘सलोखा’ वाढतोय, कशामुळे? जाणून घ्या!

heavy rain with lightning damage kharif crops along with grapes in sangli
सांगलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; द्राक्षासोबत खरीप पिकांचे नुकसान
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
caste panchayat investigates woman for love marriage with father in law in chhatrapati sambhajinagar
सासऱ्याच्या प्रेमविवाहाबद्दल महिलेला जातपंचायतीचा जाच
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
Solapur, Abuse of girl Solapur, Solapur crime news,
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…

दोन वर्षांपासून संत्रा पिकांचे अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्याची विवंचना होती. त्यातच त्यांनी शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या महिन्यात उसनवारी पैसे घेऊन त्यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे पीक कर्ज भरले होते. आता या खरीप हंगामासाठी त्यांनी पुन्हा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे पीक कर्ज घेतले होते. आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, भाऊ, सुना असा आप्त परिवार आहे.