वाशीम : सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. रिसोड शहरातदेखील रविवारी एका संस्थानवर लग्नासाठी वऱ्हाडी जमले, नवरदेव वाजत गाजत मित्र परिवारासह लग्नमंडपी जाण्यासाठी निघाला. नवरीही सजून तयार होती. मात्र, झाले उलटेच, वधूने वराला चकमा देत थेट लग्न मंडपातून आपल्या प्रियकरासह पलायन केले.

रिसोड येथील एका संस्थानात रविवारी लग्न सोहळा होता. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नवरदेव वऱ्हाडी मंडळीसह रिसोड शहरातील लग्नस्थळी पोहचले. पाहुणे जमले, नवरदेव मित्र मंडळीसह मोठ्या उत्साहात नाचत होते. लग्न घटिका जवळ आली. नवरी नटली मात्र, नवरीच्या मनात काही उलटेच होते. तिने टॉयलेटला जाण्याचा बहाणा करून आपल्या प्रियकरासह लग्न मंडपातून पलायन केले.

Delhi Pregnant teen murder
Pregnant teen murder: गर्भवती प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; प्रियकरानं करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि नंतर खड्डा खणून…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल
प्रत्येक जीव मौल्यवान असतो! बेशुद्ध सापाला CPR देऊन तरुणानं दिलं जीवदान! Viral Videoमध्ये पाहा थरारक बचाव मोहिम
‘प्रत्येक जीव मौल्यवान असतो!’ बेशुद्ध सापाला CPR देऊन तरुणानं दिलं जीवदान! Viral Videoमध्ये पाहा थरारक बचाव मोहिम
youth was beaten in Ulhasnagar, youth beaten with iron rod, Ulhasnagar latest news,
बहिणीशी बोलतो म्हणून उल्हासनगरमध्ये तरुणाला लोखंडी सळईने मारहाण
mother of three childeren left home for lover and he ran away after two months
प्रेमासाठी महिलेने पतीला सोडले पण प्रियकराने केले असे…
young girl was stabbed with sharp weapon by boyfrind is died in Pimpri-Chinchwad
पिंपरीतील ‘त्या’ प्रकरणात प्रेयसीचाही मृत्यू; लॉजमध्ये प्रियकर आणि प्रेयसी…
Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं

हेही वाचा – चंद्रपूर : “खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका”; पालकमंत्र्यांचे विविध यंत्रणांना निर्देश, म्हणाले..

बराच वेळ नवरी आढळून न आल्याने पाहुणे मंडळींनी तिची शोधाशोध घेतली. परंतु ती तिच्या प्रिकराला घेऊन पसार झाल्याचे लक्ष्यात आले. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अखेर हताश होत नवरदेव आपल्या पाहुण्यांसह आल्या पावली गेला. या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगत आहे. जग बदलत चालले असून प्रेमाचे संदर्भदेखील बदलत चालले असून, युद्धात आणि प्रेमात काय होईल हे सांगणे कठीणच आहे.