अकोला : पती, सासू-सासऱ्याने मिळून पत्नीची हत्या केल्याची घटना तेल्हारा तालुक्यात उघडकीस आली. आरोपींनी प्रथम हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे भासवले होते. पोलीस तपासात हत्या झाल्याचे समोर आले. जया गोपाल पातोंड (३२, रा.दहीगांव अवताडे, ता. तेल्हारा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

तेल्हारा पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम दहिगाव अवताडे येथील ३२ वर्षीय विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद केली.

father rape daughter
सातारा: खटाव तालुक्यात ज्येष्ठाचा चिमुरडीवर अत्याचार, घटनेने संताप; आरोपीला कोठडी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Kolhapur murder
कोल्हापूर: मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा सासू, सासऱ्याने काटा काढला; दोन्ही आरोपी जेरबंद
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
Solapur, Abuse of girl Solapur, Solapur crime news,
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
Fraud with Blind couple, baby adoption,
अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक ! प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या
Thane, Husband wife suicide, Nadgaon area,
ठाणे : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
man kills sister s boyfriend over love affairs in dehu road
पिंपरी- चिंचवड: बहिणीच्या प्रियकराची भावाने केली हत्या; तीन जण ताब्यात, आज सकाळीच आढळला होता मृतदेह

हेही वाचा – तर खासगी बसचे परमिट व परवाना रद्द होणार

या प्रकरणी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. वैद्यकीय अहवालात विवाहितेची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. तेल्हारा पोलिसांनी पती गोपाल समाधान पातोंड, सासरा समाधान किसन पातोंड आणि सासू देवका पातोंड यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जया आणि गोपालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाद होत होते. मागील महिन्यामध्ये दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली होती. काही दिवसानंतर दोघांची समजूत काढण्यात आली.

हेही वाचा – गोंदिया : आर्द्रा नक्षत्राची सुरुवात दमदार पावसाने; धान उत्पादक शेतकरी सुखावला, पेरणीला येणार वेग

पत्नी परतल्यानंतर पती तिच्यावर शेतात कामाला जाण्यासाठी दबाव आणत होता. मात्र, पत्नीने शेतात कामाला जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता. या वादातूनच विवाहितेची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.