राज्यातील महागद्दारांचे सरकार घोटाळेबाज असून या घटनाबाह्य सरकारच्या कार्यकाळात अनेक घोटाळे सामोरे येत आहेत. यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील अनेक उद्योग थेट गुजरातमध्ये पोहचले आहेत, अशी घणाघाती टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनेच लागणार. मध्यावधीमध्ये ४० खोकेबाजांना जनताजनार्दन पराभूत करून जमिनीवर आणणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा- बुलढाणा : राष्ट्रमाता जिजाऊ, संभाजी महाराज, अहिल्यादेवींचे नाव लवकरच राष्ट्रपुरुषांच्या यादीत!

mahayuti eknath shunde devendra fadanvis ajit pawar
मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा; ‘रिपोर्ट कार्ड’च्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा आरोप
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Ajit Pawar Deolali Constituency, Syed Primpy,
जातीपातीसह धार्मिक राजकारणापासून दूर – अजित पवार यांचे प्रतिपादन
The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
pm narendra modi
“हिंदूंमध्ये फूट, हे काँग्रेसचे धोरण”, पंतप्रधानांचे टीकास्त्र; निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील अनेक प्रकल्पांचे लोकार्पण
Narendra Modi Thane, Narendra Modi Ghodbunder,
विकासशत्रू महाविकास आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
satyapal malik
राज्यात भाजपचा सुपडा साफ होईल- सत्यपाल मलिक

मेहकर येथील स्वातंत्र्य मैदान येथे सोमवारी पार पडलेल्या शेतकरी संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दाणवे, खा. अरविंद सावंत, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, बुलडाणा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख आशीष रहाटे, संजय हाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, राज्यातील सरकार व त्यांचे मंत्री घटनाबाह्य असून घोटाळ्यांना पेव फुटले आहे. अलीकडच्या काळातील ‘आनंदाचा शिधा’ हे याचे उदाहरण असून हा घोटाळा आम्ही बाहेर काढून सरकारला जाब विचारणार आहोत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- अकोला: गद्दारांचे घटनाबाह्य सरकार काही महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरे

राज्यातील अनेक उद्योग, प्रस्तावित प्रकल्प राज्याबाहेर निघून जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साडे सहा लाख कोटी रुपयांचे उद्योग महाराष्ट्रात आले. मात्र, सध्याच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे यांच्या नाकाखालून वेदांतसारखे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. ज्या पक्षाने मोठे केले त्याच पक्षासोबत गद्दारी करून बंडखोरी करणारे आपल्या कृतीला उठावाची उपमा देत आहेत. हा उठाव असेल तर गुजरात मार्गे आसाममध्ये ते भित्र्यासारखे पळून का गेले? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा- नागपूर : युवक काँग्रेसची नागपूर ते तेलंगणा दुचाकी मिरवणूक

यावेळी त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा ‘राक्षशी प्रवृत्तीचा घटनाबाह्य मंत्री’ असा उल्लेख केला. कृषी मंत्री वा अन्य सत्ताधारी बांधावर आले तर त्यांना देता (मदत) की जाता? एवढेच विचारा असे, आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. ‘चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे,’ अशी विधाने जिल्ह्यातील एका आमदाराने केली होती. त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी पाठीमागून वार केले नसते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.