देशातील सरकारी कंपन्या विकण्याची मोहीमच केंद्र सरकारने उघडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोन गुजराती या कंपन्या विकताहेत, तर अदानी व अंबानी हे दाेन गुजराती त्या खरेदी करताहेत. खासगीकरणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या घालवण्याचे काम केले जात आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अदानी तर रेल्वे देखील खरेदी करायला निघाले आहेत. देशाला उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

अबू आझमी म्हणाले, ‘हिंदुस्थान ॲन्टीबॉयेटिक, एलआयसी सारख्या कंपन्या विकल्या जात आहेत. सरकारी नोकऱ्या संपवून तरुणांना करार पद्धतीच्या नोकऱ्यांमध्ये जुंपले जात आहे. अदानी आणि अंबानी यांचे हित साधण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये काहीही केलेले नाही. कुठल्याही मालमत्ता उभ्या केल्या नाहीत, जे आहे ते विकण्याचा सपाटा लावला आहे.
काँग्रेस पक्ष हा देशपातळीवर भाजपला टक्कर देऊ शकणारा एकमेव पक्ष आहे, पण या पक्षाची शक्ती आता क्षीण झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची वाढ होताना दिसत नाही. या पक्षाची ताकद वाढली पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, गर्दी तर चांगली होत आहे, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी नोंदवली.

Sanjay Raut on Chandrakant Patil Statment
Sanjay Raut : शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चांवर संजय राऊतांची रोखठोक भूमिका, चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Marriage Laws in India
विवाह-कायद्यांबाबत आजचा भारत बुरसटलेलाच…
Twinkle Khanna
“अक्षय कुमार असा लहान मुलगा…”, राजकीय विचारसरणी वेगळी असल्याच्या प्रश्नांवरून ट्विंकल खन्नाचा संताप, म्हणाली…
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Actor Ashok Saraf conferred with Padma Shri
Ashok Saraf : अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, विनोदाच्या अनभिषिक्त सम्राटाचा सन्मान
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप
फडणवीस सरकारची जन्म दाखल्यांवर करडी नजर; बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम (फोटो सौजन्य पीटीआय)
‘Vote Jihad 2’: फडणवीस सरकारची बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम; आता जन्म दाखल्यांवर करडी नजर

हेही वाचा: ‘हर हर महादेव’ चित्रपटातून शिवरायांचे चारित्र्यहनन : नाना पटोले

देशात आज नवीन संविधान लिहिले जात आहे, अल्पसंख्याकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून डावलले जात आहे. हिंदुत्वाच्या नावावर ध्रुवीकरणाचे राजकारण भाजप करीत असून ‘एमआयएम’सारखे पक्ष त्यांना आपल्या जहाल वक्तव्यांमधून मदत करण्याचेच काम करीत आहेत, असेही अबू आझमी म्हणाले.

हेही वाचा: चंद्रपूर : ‘संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करा’ विजय वडेट्टीवार यांची मागणी

अपप्रचार करून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे
भारताच्या कायद्यानुसार १८ वर्षांवरील सज्ञान तरुण-तरुणीला कुठल्याही धर्म-जातीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार बहाल केला आहे, पण केवळ अपप्रचार करून काही लोक अल्पसंख्याकांना लक्ष्य करीत आहेत. ‘लव्ह जिहाद’ नावाची कुठलीही संकल्पना अस्तित्वात नाही. केवळ अपप्रचार केला जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील ‘लव्ह जिहाद’च्या नावावर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता, पण संबंधित तरुणीने आपण स्वत: घरातून निघून गेल्याचे सांगितल्यानंतर त्या तोंडघशी पडल्या होत्या. अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करून मतपेटीचे राजकारण करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, असे अबू आझमी म्हणाले.

Story img Loader