देवेश गोंडाणे

नागपूर : राज्य शासनाच्या बदली अधिनियमानुसार कोणत्याही विभागातील वर्ग अ, ब आणि क दर्जाचे अधिकारी व कर्मचारी यांना कमाल तीन वर्षे एका विभागाचा कारभार पाहता येतो. त्यानंतर त्यांची इतर विभागात बदली करणे क्रमप्राप्त आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने नियमाला तिलांजली दिली आहे.

The administration is aware of the agitation of the tribals regarding the forest rights claim
शहरबात: आदिवासींच्या ‘सत्याग्रह’ने प्रशासन जागरूक
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Ministry of School Education of State announced appointment of Non-Government Members to Divisional Board of Education
विभागीय शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्य नियुक्त
MPSC Mantra Laws and Codes State Services Main Examination General Studies Paper Two
MPSC मंत्र: कायदे आणि संहिता; राज्यसेवा मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर दोन
Reservation will be sub-categorized
राज्यात आरक्षण उपवर्गीकरण होणार, अभ्यासासाठी सरकारकडून समिती
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date_ Maharashtra Assembly Election 2024 Date
विधानसभा निवडणूक : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजेवर गंडांतर; अपरिहार्य कारणाशिवाय रजा घेतली तर…
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
Pen stop movement by engineers in water resources and public works department
जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांचे लेखणी बंद

  मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागासह अनेक विभागात कक्ष अधिकाऱ्यापासून सहसचिव पदापर्यंत अनेक अधिकारी एकाच विभागात आहेत. त्यांची शासनाने एका विभागातून दुसऱ्या विभागातून बदलीच केली नाही, तर काही अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारीपासून सहसचिवापर्यंत त्याच विभागात पदोन्नती देण्यात आली असल्याचे चित्र गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्यांचे काम अडवले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये या अधिकाऱ्यांना त्याच विभागात बढती देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>लंकेतील अशोका वाटीकेतील श्रीराम- जानकीच्या पादुका नागपुरात

याअधिकाऱ्यांवर सरकारची मेहरनजर

सामाजिक न्याय विभागात असलेले अव्वर सचिव अनिल अहिरे ८ वर्षांपासून तर कक्ष अधिकारी प्रज्ञा देशमुख या ७ वर्षांपासून या विभागात आहे. तर सहसचिव दिनेश डिंगळे जानेवारी महिन्यात निवृत्त होत असले तरी गेल्या ९ वर्षांपासून याच विभागात कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार प्रज्ञा देशमुख यांना सामाजिक न्यायमध्ये अवर सचिव पदावर पदोन्नती देण्यात आली. तसा

प्रस्ताव खुद्द विभागानेच दिल्याची माहिती आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यावर विभागाची मेहरजनर का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बदली अधिनियम काय सांगतो?

शासकीय कर्मचारी हा गट ‘क’ मधील ‘बिगर-सेक्रेटरिएट’ सेवेतील असेल तर, अशा कर्मचाऱ्याने धारण केलेल्या पदावर दोन वर्षे पूर्ण पदावधींची सेवा पूर्ण केल्यानंतर, त्याची त्या कार्यालयातून किंवा विभागातून दुसऱ्या कार्यालयात किंवा विभागात बदली करण्यात येईल. याशिवाय असा कर्मचारी सेक्रेटरिएट सेवेत असेल तर, अशा कर्मचाऱ्याला तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी त्याच पदावर ठेवण्यात येणार नाही.

सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयात कुठल्या अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात पदोन्नती देण्यात आली हे तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.  – नितीन गद्रे, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग.