अनिल कांबळे

नागपूर : फेसबुक-इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून मैत्री व नंतर तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर काही दिवसांतच प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतात. कुटुंबाचा विरोध झुगारून लग्न करतात. परंतु, वर्षभराच्या आतच दोघांमध्ये कुरबूर होते आणि प्रेमविवाह ताटातूट होण्याच्या मार्गावर येते. गेल्या पाच वर्षांत ३ हजार ४०० अशाच प्रेमीयुगुलांनी भरोसा सेलमध्ये तक्रारी केल्या आहेत.

monkeypox case confirmed in kerala
Monkeypox : केरळमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; गेल्या आठवड्यात यूएईवरून भारतात झाला होता दाखल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Crime against three who tie down man in house even after repaying the loan
कर्जाची परतफेड केल्यानंतरही घरात डांबणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा
cyber crime
Nagpur Crime News : सायबर चोरट्यांनी ६० लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्यानंतर ५१ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
Boyfriend killed girlfriends four year old son after he vomits
उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
loksatta kutuhal Artificial Intelligence and New World Colonies
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या जगातील वसाहती
Vasai Virar, tree census,
वसई विरारमध्ये पालिकेची वृक्ष गणनेकडे पाठ, आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही वृक्षगणना नाही
Thane, Bhiwandi, orphanage, child abuse, Anath Ashram, minor, arrest, investigation, Two and a Half Year Old Girl Allegedly Beaten
ठाणे : अनाथ आश्रमातील अडीच वर्षीय मुलीला चटके, संचालक अटकेत

‘फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टिंडर, डेटिंग साईट्स’वरून अनेक तरुण-तरुणी एकमेकांशी मैत्री करतात. तसेच काही शिक्षण घेताना किंवा परिसरातील तरुण-तरुणींशी मैत्री करतात. मैत्रीतून लगेच काही दिवसांतच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात. एकमेकांवर पैसे खर्च करणे, सिनेमा, हॉटेल, महागडी खरेदी सुरू होते. एकमेकांना वेळ देण्यात येतो. काही तरुण-तरुणी लग्नाबाबत कुटुंबीयांशी चर्चा करतात तर काही थेट न्यायालयातून नोंदणी विवाह किंवा पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात.

हेही वाचा >>> नागपूर : भाजप समर्थित उमेदवार नागो गाणारांची थेट देवेंद्र फडणवीसांविरोधात भूमिका

 कुटुंबीयांच्या विरोधाला झुगारून दोघेही प्रेमविवाह करतात. प्रेमविवाहानंतर केवळ सहा महिने ते वर्षभरात दोघांतील संबंधात दुरावा निर्माण होते. दोघांचेही प्रेम कमी होते आणि थेट एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. उपराजधानीत गेल्या पाच वर्षात जवळपास प्रेमविवाह करणाऱ्या ३ हजार ४०० तरुणींनी भरोसा सेलमध्ये तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : “बदला घ्यायचा आहे…”, माजी मंत्री हंसराज अहीर यांच्या चित्रफितीने राजकारण तापले

आता मला बंधन नकोय

प्रियकर-प्रेयसीचे नाते चांगले होते. लग्न झाल्यानंतर मोठ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. सासू-सासरे आणि पतीने नातेवाईकांचेही नखरे सहन करावे लागतात. प्रियकराचा पती झाल्यानंतर तो पूर्वीसारखा वेळ देत नाही, पहिल्यासारखे प्रेम उरले नाही. त्याला आता माझी गरज नाही. त्याच्या मनात कुणीतरी दुसरी असावी, म्हणून तो माझ्याकडे दुर्लक्ष करतो. आता मला बंधन नकोय, अशा तक्रारी करीत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : अर्ज भरताना गाणारांसोबत भाजपचा एकही बडा नेता नाही

वाढत्या अपेक्षांमुळे वाद

लग्न झाल्यानंतर तरुण-तरुणींच्या वागण्यात बदल होतो. सहाजिकच तरुणावर कुटुंबासह पत्नीची जबाबदारी असते. त्यामुळे दोन पैसे कमावण्यावर तो भर देतो. तर याउलट प्रेयसीची पत्नी झाल्यानंतर पतीकडून जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांच्या नव्या संसारात खटके उडण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, भरोसा सेलमध्ये तक्रार आल्यानंतर दोघांनाही बोलावून संसार आणि वैवाहिक आयुष्याबाबत समुपदेशन केले जाते. अनेकांचे संसार नव्याने थाटण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

– सीमा सूर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.

प्रेमविवाहानंतरच्या तक्रारींची आकडेवारी

वर्ष – तक्रारी

२०१७ – ५२४

२०१८ – ५५३

२०१९ – ३८६

२०२० – ४५८

२०२१ – ६४१ २०२२ – ७८०