लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीतील गणेशपेठ परिसरात नियमबाह्यरित्या खासगी ट्रॅव्हल्स कुठेही उभ्या करून प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे गुरुवारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या येथील ११ ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांचे धाबे दणाणले आहे.

Accident prone platform in Thane station hits passengers thane
ठाणे स्थानकात अपघातप्रवण फलाटाचा प्रवाशांना धसका
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Traffic changes in Thane Kalyan Bhiwandi on the occasion of Anant Chaturdashi
ganpati Visarjan 2024 : ठाणे, कल्याण, भिवंडीत वाहतुक बदल
ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Trans Harbor route affected due to technical fault near Nerul railway station
नेरुळ येथे तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतुक विस्कळीत, ठाणे, ऐरोली, रबाळे सह महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
velankanni, passengers going to velankanni,
वेलांकन्नी येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

गणेशपेठ बसस्थानक परिसरात रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे नेहमीच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या बसेसमुळे येथे बरेच अपघातही होतात. याचा फटका केंद्रीय मंत्र्यांना देखील बसला आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारींमुळे माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत कारवाईची सूचना केली होती.

आणखी वाचा-नागपूरच्या कोणत्या ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाचा नमविस्तार?

ही कारवाई गणेशपेठचे पोलीस निरीक्षक एच. आर. घाडगे, आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षक मंजूषा भोसले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीणा झोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

बसचालकांनी गाठले अन्य स्थळ

गुरुवारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या सकाळपासून ११ बसेसवर कारवाई केली. ही कारवाई पुढेही चालणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कारवाई सुरू झाल्यावर येथील बऱ्याच बसेस चालकांनी येथून पलायन करून इतर स्थळ गाठल्याची सूत्रांची माहिती आहे.