लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीतील गणेशपेठ परिसरात नियमबाह्यरित्या खासगी ट्रॅव्हल्स कुठेही उभ्या करून प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे गुरुवारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या येथील ११ ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांचे धाबे दणाणले आहे.

Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
Mumbai Western Railway Jumbo Block
जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर प्रचंड गर्दी

गणेशपेठ बसस्थानक परिसरात रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे नेहमीच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या बसेसमुळे येथे बरेच अपघातही होतात. याचा फटका केंद्रीय मंत्र्यांना देखील बसला आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारींमुळे माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत कारवाईची सूचना केली होती.

आणखी वाचा-नागपूरच्या कोणत्या ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाचा नमविस्तार?

ही कारवाई गणेशपेठचे पोलीस निरीक्षक एच. आर. घाडगे, आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षक मंजूषा भोसले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीणा झोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

बसचालकांनी गाठले अन्य स्थळ

गुरुवारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या सकाळपासून ११ बसेसवर कारवाई केली. ही कारवाई पुढेही चालणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कारवाई सुरू झाल्यावर येथील बऱ्याच बसेस चालकांनी येथून पलायन करून इतर स्थळ गाठल्याची सूत्रांची माहिती आहे.

Story img Loader