नागपूर : राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. पण सरकारकडून दखल घेतली जात नाही. आंदोलनात लाठीमार झाल्यावर कुणीतरी अधिकारी निलंबित केला जातो, पण लाठीमाराचा आदेश देणाऱ्या जनरल डायरचे काय, असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ४० आमदारांचे सदस्यत्व रद्द होणे आवश्यक आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाप्रमाणे न्याय देणारी असली पाहिजे.
यानंतर ते मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपूरमार्गे रवाना झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा