लोकसत्ता टीम

बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’ आघाडीतील समावेश अद्याप अधांतरीच आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनामध्ये युती झाली खरी, परंतु महाविकास आघाडीत अद्याप वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यास हिरवी झेंडी दिलेली नाही. यामुळे वंचितचा इंडिया आघाडीतील समावेशही रखडला आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीत समावेश होणार का? या प्रश्नावर आता अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
The leaders of the constituent parties expressed their sentiments in the condolence meeting that the India Maha Aghadi was united because of Yechury
येचुरींमुळे ‘इंडिया’ महाआघाडी एकत्र! शोकसभेत घटक पक्षांच्या नेत्यांकडून भावना व्यक्त
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
Supriya sule and ajit pawar
Supriya Sule : “अजित पवार आमचं आयुष्य विस्कळीत करून गेले”, सुप्रिया सुळेंचं विधान; म्हणाल्या…
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
conversation with cpim secretary sitaram yechury last year in loksatta loksamvad event
Sitaram Yechury : राजाप्रजा प्रथेकडे उलट प्रवास

शिवसेनेसोबत आमची बोलणी झाली खरी, पण लग्नाची तारीख अजून निघायची बाकी आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. शेगाव येथे बारी समाजाच्या अधिवेशनासाठी आले असता माध्यमाशी बोलताना त्यांनी हे मजेदार वक्तव्य केले. ‘इंडिया’ महाआघाडीत सामील होण्यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत तोपर्यंत आमचं लग्न होत नाही. त्यामुळे आम्हाला थांबावे लागत आहे.

आणखी वाचा-बुलढाण्यात भीषण दुर्घटना, मेळघाटातील मजुरांना ट्रकने चिरडले; तीन जण ठार

दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हातमिळवणी झाली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूरच आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होतो, हे आगामी निवडणुकांतच समजू शकेल.