नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तब्बल ३४ वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन कनिष्ठ अभियंतांना पदाचा लाभ देण्याचे आदेश दिले आहे.१९९० मध्ये परीक्षा उत्तीर्ण केल्यापासून या तीन अभियंतांनी पदलाभ देण्याची मागणी केली होती. यावर आता न्यायालयातून त्यांना दिलासा मिळाला आहे. गडचिरोली येथील रमाकांत बोंबले, दीपक आंबुलकर आणि संजीव धकाते अशी प्रतिवादी अभियंतांची नावे आहेत. या तीन प्रतिवादींची सार्वजनिक बांधकाम विभागात १९८४ मध्ये ‘सर्व्हेअर’च्या पदावर नियुक्ती झाली होती. शासन निर्णयानुसार त्यांनी कनिष्ठ अभियंता पदाकरिता विभागीय परीक्षा दिली. १९८९ मध्ये त्यांनी ही विभागीय परीक्षा उत्तीर्ण केली. १९९० मध्ये या विभागीय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. १ फेब्रुवारी १९९० मध्ये ते या पदासाठी पात्र होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा