वर्धा: शासकीय कामांचा खाक्या नव्याने सांगण्याची गरज नाही. अर्धवट कामे टाकून दिल्याने नागरिकांना होणारा मनस्ताप नित्याचा. कारंजा घाडगे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक सुरू झाली. परंतु त्यावर पथदिवे लागण्याचा पत्ताच नव्हता. रस्त्यावर प्रकाश नाही व भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहने यामुळे नागरिक कोंडीत सापडले होते. धावडी, खैरी, भालेवडी येथील लोकांचे याच मार्गावरून येणे जाणे असते. अंधार राहत असल्याने बायाबापडे त्रस्त झाले होते.

हेही वाचा… नागपूर: कुख्यात गुन्हेगार शेख अफसरच्या घरातून ६ काडतूस जप्त

अखेर नागरी संघर्ष समितीने महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे निवेदने देणे सुरू केले. परंतु ते न ऐकल्याने दिवाळीपूर्वी पथदिवे सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. चक्रे गतीने फिरली. पथदिवे सुरू झाले. रस्ता प्रकाशमान झाल्याने दिलासा मिळाला असल्याची भावना संघर्ष समितीने व्यक्त केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After giving statements to the highway authority officials street lights on the highway started pmd 64 dvr
Show comments