राज्य सरकार आणि केंद्र सरकारला वारंवार निवेदने, आंदोलने केल्यानंतरही शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. सोयाबीन आणि कापसाला योग्य तो भाव दिला जात नाही. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना प्रीमियमपेक्षाही कमी पैसे दिले. अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, याबाबत सरकार संवेदनशील नाही. त्यामुळे सरकारने १० फेब्रुवारीपर्यंत आमच्या मागण्या मान्य न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ११ फेब्रुवारीपासून विदर्भात व मराठवाड्यात तीव्र आंदोलन करू, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली.

हेही वाचा >>>फडणवीस यांना नागपुरात ‘तोच’ अनुभव

pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
BMC budget 2025 news in marathi
पालिकेच्या अर्थसंकल्पाला मालमत्ता कराचा हात; १२५० कोटींनी उद्दिष्ट वाढले; ७५ टक्के मालमत्ता कर वसूल
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मालेगाव येथे मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी माध्यमाशी संवाद साधताना तुपकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने सोयाबीनला आठ हजार तर कापसाला साडेबारा हजार रुपये दर खासगी बाजारात द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली. वारंवार आंदोलने केल्यानंतर देखील हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. हे चुकीचे असून आमच्या मागण्या १० फेब्रुवारीपर्यंत मान्य न केल्यास ११ फेब्रुवारीपासून विदर्भ आणि मराठवाड्यात आक्रमक आंदोलन पुकारू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. यावेळी इतरही पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Story img Loader