लोकसत्ता टीम

नागपूर : अजित पवार हे सत्तेसाठी नाही तर ईडीमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत असल्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसेलच, अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलत होते.

Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
maharashtra minister chandrakant patil come down on road to fill potholes in city pune
चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘कोथरूड’मध्ये ‘खड्डे’ बुजविण्याची दक्षता; हे सर्व निवडणुकीसाठी असल्याची विरोधकांची टीका
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
bajrang punia replied to brij bhushan singh
“विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!
Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore MArathi News
कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान

बारामतीच्या सभेत अजित पवार, मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो असे म्हणाले. याचा अर्थ मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी अजित पवार गेले हे समजू शकतो. मात्र असे असले तरी अजित पवार सत्तेसाठी गेले नाही तर ईडीच्या भीतीमुळे गेले आहेत. राष्ट्रवादी शंभर टक्के फुटलेली आहे, नऊ आमदार फुटल्यामुळे हे आता स्पष्ट झालं आहे. अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे गुणगान करण्याचा दृष्टांत दहा वर्षापूर्वी का झाला नाही. आत्ताच का झाला ते त्यांनाच माहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.

आणखी वाचा-बावनकुळे म्हणतात, “वडेट्टीवार उद्या काय बोलायचे आहे ते रात्रीच लिहून ठेवतात…”

मनसेकडून मुंबई गोवा पदयात्रा काढली जात आहे. तो रस्ता खराब झाला ते योग्य आहे, यापूर्वी आंदोलन होण्याची गरज होती, समृद्धीपेक्षा तो रस्ता जास्त महत्वाचा आहे, अनेक जण कोकणात जातात. तो रस्ता जीव घेणारा आहे. त्या रस्त्यावर आंदोलन होत असतील तर नक्कीच रस्ता दुरुस्त होईल, असेही वडेट्टीवर म्हणाले.