अकोला : खारपाणपट्ट्यातील गावासाठी नियोजित असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आजपासून (दि. १० एप्रिल) शिवसेनेकडून (ठाकरे गट) टँकरमधील खाऱ्या पाण्यासह अकोला-नागपूर पायदळ मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून ६९ गावांतील खारे पाणी जमा केले जात आहे. उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पाणी पिण्याची आणि त्याच पाण्याने आंघोळ करण्याची विनंती ग्रामस्थ व शिवसैनिक करणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली.

खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्रोत नसल्याने ग्रामस्थांना खारे पाणी प्यावे लागते. ग्रामस्थांना गोड पाण्याची व्यवस्था होण्यासाठी ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. ६९ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले. ४३ कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. त्यापैकी २७ कि.मी. अंतरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. २१९ कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत १२५ कोटींचा खर्च झाला असून, ९२ कोटी रुपये कंत्राटदाराला अदाही करण्यात आले आहेत.

To support hunger strike Dhangar community member climbed mobile tower
बुलढाणा : तब्बल दहा तास टॉवरवर चढून आंदोलन; उडी घेण्याचा…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Protest In Shimla Against Alleged Illegal Construction Of Mosque
हिमाचल प्रदेशात मशिदीतील अवैध बांधकामांबाबत निदर्शने ; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा
diverting surplus water from ulhas and vaitrana sub basins godavari basin in Marathwada
बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी
Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा

हेही वाचा – व्याघ्र संवर्धनात राज्याची दर्जेदार कामगिरी; देशभरात ३,१६७ वाघांची नोंद, पंतप्रधानांच्या हस्ते अहवाल जाहीर

हेही वाचा – सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर तर, आमची शेतकऱ्यांवर : पवार

दरम्यान, तेल्हारा तालुक्यातून या योजनेला विरोध झाला. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह आमदार प्रकाश भारसाकळे यांनी योजनेला स्थगिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. याविरोधात आता वातावरण तापले आहे. या विरोधात आमदार देशमुख यांनी विधिमंडळाच्या परिसरात उपोषण आंदोलनदेखील केले. आता स्थगितीला निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ग्रामस्थांसह अकोला ते नागपूरपर्यंत पायदळ मोर्चा काढण्यात येणार आहे. नागपूरपर्यंत ९ ठिकाणी मुक्काम राहणार आहे. पहिला मुक्काम अंबिकापूर येथे तर शेवटचा मुक्काम १९ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील धामना येथे राहील. त्यानंतर २१ एप्रिलला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवास्थानी मोर्चा पोहोचणार आहे. त्याठिकाणी खारे पाणी फडणवीस यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.