लोकसत्ता टीम

नागपूर : काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी महापालिकेतील गैरव्यवहाराबाबत आरोपांचे सत्र सुरू केले आहे. मात्र, याबाबत अद्यापही प्रशासनाने उत्तर न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
bjp unexpected hat trick in haryana assembly election
विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Chief Minister Eknath Shinde Shiv Sena challenges BJP leaders in Boisar Assembly Election 2024
मुख्यमंत्री शिंदे यांच्या खेळीने बोईसरमध्ये भाजप नेते अस्वस्थ
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच नागपूर मतदारसंघात निवडणुका आटोपल्यावर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबल्या होत्या. मात्र, ठाकरे यांनी निवडणुका संपताच महापालिका प्रशासनावर एकापाठोपाठ एक आरोपांचे सत्र सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबईच्या शिक्षण संस्थेला अत्यंत कमी दरात महापालिकेने दिलेल्या जागेचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेच्या शाळांसाठी जागा नसताना एखाद्या खासगी शिक्षण संस्थेवर महापालिका मेहरबान का? असा सवाल त्यांनी केला होता. या आरोपावरही महापालिकेकडून उत्तर आले नाही.

आणखी वाचा-धक्कादायक! तोतया वकील महिलेने मागितली १.१० लाखांची खंडणी

काही दिवस जाताच ठाकरे यांनी इलेक्ट्रिक बसच्या १३०० कोटींच्या निविदेचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या कंपनीशी संबंधित कंपनीला हे कंत्राट मिळावे म्हणून महापालिका प्रशासनाने फेरनिविदा काढली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे, भाजपचे शहर अध्यक्ष व परिवहन समितीचे माजी प्रमुख बंटी कुकडे यांनीही या प्रकरणात प्रशासनाकडे बोट दाखवले होते. परंतु, अधिकृतपणे प्रशासनाकडून याबाबत खुलासा किंवा आरोपही फेटाळण्यात आले नाही.

रविवारी ठाकरे यांनी पुन्हा सुस्थितीत असलेले रस्ते खोदण्याचा मुद्दा उपस्थित करीत यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महापालिका प्रशासनाला दोषी धरले आहे. २०१६ मध्येच केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून जलवाहिन्या टाकण्याच्या कामांना मंजुरी मिळाली असताना आता त्यासाठी नव्याने बांधलेले रस्ते खोदण्याचे औचित्य काय, असा सवाल केला आहे. रस्ते खोदण्याचा खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याच्यावरही उत्तर आले नाही.

आणखी वाचा-नागपूर : मोकळ्या मैदानात मांडव टाकून जुगार! १२ जुगारी; २१ लाखांचा माल…

“इलेक्ट्रिक बस निविदा रद्द करावी, जलवाहिन्यांसाठी सुस्थितीतील रस्ते खोदण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, याबाबत महापालिका प्रशासनाला पत्र पाठवले आहे.” -आ. विकास ठाकरे, अध्यक्ष, शहर काँग्रेस.