बुलढाणा : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या लढतीत भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी येथे केला. तसे झाले असते तर पदवीधरचा निकाल वेगळाच लागला असता, असा दावाही त्यांनी बोलून दाखवला. आज दुपारी जाहीर झालेल्या निकालानंतर प्रसिद्धी माध्यमांशी चर्चा करताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार संजय गायकवाड यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मित्रपक्षाच्या नेत्यांना दोन खडे बोल सुनावले.

हेही वाचा >>> पहिल्याच लढतीत लिंगाडे ठरले ‘जायंट किलर’!, रणजीत पाटलांची ‘हॅट्रिक’ हुकवली अन् मंत्रिपदाची संधीही…

Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Sanjay Raut on Devendra Fadnavis
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल मुख्यमंत्री; पालकमंत्रीपदाचा निर्णय बदलताच संजय राऊत यांची टीका
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”
Sunil Tatkare On Bharatshet Gogawale
Sunil Tatkare : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत धूसफूस? गोगावलेंच्या नाराजीवर तटकरेंचं मोठं विधान; म्हणाले, “सर्वांच्या मनाचं…”

प्रचारात भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले की, जिल्ह्यात आमचा खासदार आहे, दोन आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला सोबत घेतले असते तर पंधरा-वीस हजारांचे मतदान दिले असते, असा दावाही गायकवाड यांनी केला. मात्र, हा विजय आघाडीचा नसून बारा वर्षांपासून रणजीत पाटील आमदार असल्याने त्यांच्या विरुद्ध ‘अँटी इंकंबन्सी’ हा घटक पराभवात महत्त्वाचा घटक ठरला. तसेच जुनी पेन्शन हा कळीचा मुद्धा ठरल्याचे ते म्हणाले.

Story img Loader