वर्धा : सर्वाधिक नासाडी व प्लास्टिक कचरा हा सार्वजनिक जेवणावळीतून होत असल्याचे पाहायला मिळते. अशा समारंभात ताट, वाट्या, पेले अशी भांडी आता जवळपास हद्दपार झाली आहेत. त्याऐवजी प्लास्टिक किंवा डिस्पोजेबल म्हटल्या जाणारी भांडी वापरल्या जात आहेत. मात्र त्यामुळे होणारे प्रदूषण कोणी गांभीर्याने घेत नाही.

घरोघरी होणाऱ्या समारंभात अशी एकदा वापरली जाणारी भांडी मोठा कचरा निर्माण करीत असल्याचे पाहून येथील गुंज ही संस्था चिंतेत पडली. पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारी ही संस्था गृहिणींनी आता प्लास्टिक हटावसाठी कार्यरत केली. प्लास्टिक भांड्याऐवजी संस्थेतर्फे नाममात्र शुल्कात स्टीलची भांडी पुरविल्या जात आहे.

पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे, ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Making public spaces waste free by creating artwork from waste materials Pune news
टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती उभारत सार्वजनिक जागा केली ‘कचरामुक्त’
Pankaja Munde , Polluted Water,
प्रदूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी आराखडा, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा
mpsc exam preparation tips,
MPSC मंत्र : निर्णय क्षमता: पर्याय विश्लेषण व श्रेणीकरण
bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
issue of Illegal garbage dump at Gaimukh area
गायमुख परिसरात बेकायदा कचराभुमी ? राष्ट्रीय हरित लवादाने बजावली पालिकेला नोटीस, महिनाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
Re Sustainability Aarti Industries join hands in the field of plastics recycling
प्लास्टिक्स पुनर्प्रक्रिया क्षेत्रात री सस्टेटनिबिलिटी-आरती इंडस्ट्रीज एकत्र; संयुक्त कंपनीचे पाच वर्षांत ५,००० कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट

हेही वाचा – रात्रीच्या अंधारात कारध्याच्या धोकादायक लहान पुलावर चालतं असं काही; जिल्हा प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष

हेही वाचा – राज्यात पुढील पाच दिवस महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा

घरच्या छोटेखानी भोजन सोहळ्यात ताट, वाटी व पेले संस्थेतर्फे केवळ पन्नास रुपये आकारून दिल्या जात आहेत. काही रक्कम ठेव स्वरुपात घेतल्या जाते. ती भांडी परत केल्यावर वापस मिळते. संस्थेच्या हर्षा परमानंद टावरी सांगतात की हा एक छोटा प्रयत्न आहे. प्रतिसाद पाहून भांडी वाढवू. या निमित्ताने प्लास्टिक भोजनातून बाद करण्याचा संदेश दिल्या जात आहे. घरगुती भोजन समारंभात गृहिणीच निर्णय घेत असतात. म्हणून घरातील महिलेवर प्लास्टिक हद्दपार करण्याचा संस्कार होणे आवश्यक ठरते, असे टावरी म्हणतात.

Story img Loader