वर्धा: सध्या अधिक मास सुरू असून जावई बापूंचा भाव चांगलाच वधारला आहे. हा दानाचा महिना म्हणून आपापल्या परीने दान केले जात आहेत. यात सर्वाधिक मान जावयास दिला जातो. हिंदू धर्मात लेकी जावयास लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून मान्यता आहे. या अधिक मासात त्यांना घरी बोलावून यथोचित सत्कार केला जातो.

जावयास कपडेलत्ते, भेटवस्तू, दागिने दिले जातात. पण खाद्यात अनारसे या पारंपरिक पदार्थाचे विशेष महत्व असते. चांदी किंवा तांब्याच्या ताटात तुपात तळलले तेहत्तीस अनारसे देतात. त्याचे भाव चांगलेच वधारले. सध्या ५०० रुपये किलोने ते विकले जात आहेत. तुपाचे ९०० रुपये किलो आहेत. हा पदार्थ सुग्रणीचा कस लावणारा मानला जातो.

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
Winter, Gold Rate , Gold Rate Nagpur ,
सोन्याच्या दराने थंडीतही फोडला घाम… दर बघून…
gold 83 thousand marathi news
सोन्याला उच्चांकी झळाळी, दिल्लीत ८३ हजारांची उच्चांकी भावपातळी
Nagpur Gold price know today rate
सोन्याचे दर नवीन उच्चांकीवर… हे आहे आजचे दर…
gold silver price hike today
Gold silver Rate Today : ग्राहकांनो, सोन्याचा दर ८० हजाराच्या पार, चांदीचाही वाढला भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
garlic price marathi news
लसणाच्या दरातही घसरण, प्रतिकिलो दर ६०० वरून २०० रुपयांवर

हेही वाचा… बुलढाणा : जिल्हा परिषदेत आंदोलन करणाऱ्या शाळा समिती अध्यक्षासह ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल, शिक्षणाधिकाऱ्यांची तक्रार

चार दिवस तांदूळ पीठ भिजवून त्याचे नंतर लाटन व मग तळण असा व्याप असतो. जाळीदार अनारसे जिला जमते, ती खरी सुग्रन अशी मान्यता आहे. ते आजकाल शक्य होत नसल्याने कॅटरर कडून विकत घेतले जात आहेत. कारण त्याशिवाय जावयाचा मान पूर्ण होत नाही, अशी प्रथा आहे. हा महागडा पदार्थ करणे किंवा विकत आणणे शक्य नसल्यास मोठे बत्ताशे ताटात ठेवले जातात आणि जावयाचे लाड पुरवले जातात.

Story img Loader