नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस दलात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाच्या माध्यमातून तीन हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. हे महामंडळ सुरक्षा रक्षकांची (सेक्युरिटी गार्ड) भरती करते. राज्य सरकार सुरक्षा रक्षकांना पोलिसांची जबाबदारी देणार आहे का, असा प्रश्न करीत हा निर्णय रद्द करण्याची मागणी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा – नागपूर : हलबा समाजावर अन्याय, राष्ट्रीय आदिम कृती समितीचे आज आंदोलन

Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
women given special discounts by builders in thane
ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा – “निवडणुकीत पराभवाच्या भीतीने कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका, म्हणाले…

देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी ‘सेक्युरीटी गार्ड’ला पोलीस म्हणून पोलीस खात्यात भरती करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचा निषेध आहे. पोलीस भरती होणार म्हणून अनेक तरुण – तरुणी गेल्या तीन वर्षांपासून तयारी करीत आहेत. परंतु पोलीसमध्ये कंत्राटी भरती करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. पोलीस विभागाकडे अनेक मोठ्या गुन्ह्याचा तपास करण्याचे काम असते. अशा महत्त्वाच्या खात्यात सेक्युरिटी गार्डला कंत्राटी पद्धतीवर भरती करून राज्यामधील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम राज्य सरकार करणार काय, असा प्रश्नसुद्धा अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

Story img Loader