नागपूर : माजी गृहमंत्री व काँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गेल्या तीन आठवड्यात तीन पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

देशमुख गेल्या महिन्याच्या अखेरीस तुरुंगातून बाहेर आले. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ते सुमारे दीड वर्षांपासून तुरुंगात होते. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हातील संत्री व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण करुन राज्य सरकारला अहवाल सुद्धा सादर करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही संत्री उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी  देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
watermelon Raigad demand Dubai business export
रायगडच्या कलिंगडांना दुबईत मागणी
Bhagyashree Fund , Maharashtra Kesari,
पुण्याची भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी, म्हणते ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय
session on how to use the money collected under Ladki Bahin Yojana will be given by the government Mumbai news
‘लाडक्या बहिणीं’ना आर्थिक साक्षरतेचे धडे!
Ladki Bahin Yojana , Anil Deshmukh,
तपासणीच्या नावाखाली लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केल्यास… अनिल देशमुखांचा इशारा
Deputy Chief Minister Eknath Shinde directed to build Ayushman Shatabdi Tower in KEM for patients Mumbai print news
रुग्णांसाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
woman from Karachi now Nagpur daughter in law struggled for three decades to gain Indian citizenship
नागपूर : तीन दशकाच्या संघर्षानंतर पाकिस्तानी सून बनली भारतीय नागरिक…

हेही वाचा >>> नागपूर : मुन्ना यादवच्या मुलांचा गडकरींच्या खासदार क्रीडा महोत्सवात हैदोस

संत्री व मोसंबी उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातच बांग्लादेशने आयात शुल्कात मोठया प्रमाणात वाढ केल्याने शिल्लक राहिलेली संत्री व मोसंबीला भाव मिळाला नाही. अशा दुहेरी संकटातून संत्री व मोसंबी उत्पादक जात आहेत, राज्य शासनाने संत्रा व मोसंबी उत्पादकांना भरीव मदत करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्रातून केली आहे. यापूर्वी देशमुख यांनी काटोल येथे न्यायालयाची मागणी केली होती. तसेच मागील सरकारने विकासकामांच्या मंजुरीला दिलेली स्थगित उठवण्याची मागणी केली होती. आता तिसऱ्या पत्रात संत्री आणि मोसंबी उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

Story img Loader