नागपूर : महाराष्ट्रातून गुजरात आणि इतर राज्यांत जाण्यासाठी दिवसभरात अनेक रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. परंतु, राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अत्यल्प आहे. त्याचा फटका विद्यार्थी, युवक, व्यावसायिकांना बसत आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, औरंगाबाद हे शहर शिक्षण, व्यवसायासोबतच सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहेत. मुंबई राज्याची राजधानी आहे तर नागपूर उपराजधानी. औरंगाबाद आणि नांदेड मराठावाड्यातील प्रमुख शहर आहेत. या शहरांचे राज्यातील इतर भागाशी जुळणे अपेक्षित आहे. परंतु, चित्र उलट आहे. महाराष्ट्राला देशातील इतर राज्यांशी जोडणाऱ्या भरपूर गाड्या आहेत. गुजरातमधील अहमदाबादसाठी तर मुंबईहून दिवसभरात तब्बल ३३ रेल्वेगाड्या आहेत. याउलट नागपूर उपेक्षितच आहे. नागपूरमार्गे देशाच्या सर्वच भागात रेल्वेगाड्या धावतात. मात्र, यापैकी अनेक रेल्वेगाड्यांना स्थानिक कोटा नाही किंवा त्यांच्या वेळा सोयीच्या नाहीत.

Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
Tax issues with companies take contract of Mumbai Goa highway work
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये  कर थकविला
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
maharashtra awaits additional railway trains for maha kumbh mela
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता

हेही वाचा – वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात बुकी मालामाल तर नवख्या सट्टेबाजांना जबर फटका; पोलिसांची करवाई मात्र शून्यच…

काही शहरांसाठी तर थेट रेल्वेगाडीच नाही. नागपूर ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान गाडी नाही. मुंबई आणि नांदेड, औरंगाबादकरिता केवळ तीन गाड्या आहेत. नागपूर ते पुणे तसेच नागपूर ते मुंबईदरम्यान थेट गाड्यांची संख्यादेखील कमी आहे. पुण्यासाठी केवळ महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. मुंबईकरिता नागपूरहून थेट धावणाऱ्या गाड्यांमध्ये सेवाग्राम एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस आहे. याबाबत माहिती देताना भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला म्हणाले, नागपूरहून पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी दिल्ली, बंगळुरू, लखनौसाठी थेट गाड्या सुरू करण्याची गरज आहे. नागपूर भौगोलिकदृष्ट्या मध्यभागी असल्याने येथून शेकडो गाड्या धावतात. पण, त्यांचा फारसा लाभ नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना होत नाही.

हेही वाचा – “नव्या योजनेची माहिती नाही अन् जुन्या योजनेचे पैसे मिळालेच नाही”, शासन आपल्या दारी कार्यक्रमातील उपस्थितांची व्यथा

नागपूर ते पुणेदरम्यान नवीन गाडी चालवणे शक्य नाही. त्यामुळे नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे लावले आहेत. तसेच वेळोवेळी पुणे आणि मुंबईकरिता विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. – तुषारकांत पांडे, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे.

Story img Loader