झाड एक, त्याच्या फांदीवर टाकलेला दोरही एकच, एका बाजूला वडील, तर दुसऱ्या बाजूला तरणाबांड मुलगा. दोघांनी एकाच वेळी गळफास घेतला आणि या व्यवस्थेचा निरोप घेतला. कुणाचा जीव पहिले गेला असेल? पित्याचा की पुत्राचा? हे हळहळ वाढवणारे प्रश्न अजून विचारले जात आहेत. आर्णीजवळ शेलूच्या या घटनेनंतर परवा बाभूळगावात घडलेली दुसरी घटना. विहीर एकच, आधी अल्पभूधारकाने पोटच्या तीन मुलांना पाण्यात फेकले, नंतर स्वत: उडी मारली. पावसाअभावी करपलेली सोयाबीन त्याच्या डोळ्यासमोर होती. तेथेही मृत्यूच जिंकला. सरकार बदलले, आश्वासनांचा पाऊस पडायला लागला, लाल दिव्यातील माणसे बदलली, याच बळीराजाच्या दु:खाचे भांडवल करून नेते झालेल्या नेत्यांना सुद्धा लाल दिवा मिळाला. बदलले नाही ते फक्त शेतकऱ्यांचे दु:ख.. त्याची परिस्थिती!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा