लोकसत्ता टीम

अकोला : राज्यातील पैदासक्षम गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले आहे. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गाय-म्हशींची संख्या सुमारे ४० लाख आहे. राज्यातील दूध उत्पादन क्षमता वाढण्यासाठी गाय व म्हशींचे वंधत्व निवारण उपक्रम पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणार आहे.

nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
march held demanding permanent Rs 7 subsidy and a price of Rs 40 per liter for cows milk
कोल्हापुरात दूध उत्पादकांचा दरवाढीसाठी गायींसह मोर्चा
Loksatta explained Why and how much did milk collection increase
विश्लेषण :राज्यात दुधाचा महापूर?
cow milk health benefits
गायीच्या दुधाला पृथ्वीवरील अमृत का म्हटलं जातं?
milk adulterants, Maharashtra , milk samples, milk,
राज्यभरातून एका दिवसांत ११०० दुधाचे नमुने जप्त, अन्न आणि औषध प्रशासन दूध भेसळखोरांविरोधात आक्रमक
Record daily collection of 1 crore 71 lakh liters of milk in the financial year
राज्यात दुधाचा ‘महापूर’; गत आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 

वंधत्व हे गाय, म्हैस भाकड राहण्याचे प्रमुख कारण आहे. सर्वसाधारणपणे कालवडी २५० किलो व वासरे २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवतात. जनावरांमध्ये सलग तीन आठवडे वजनात घट दिसून आल्यास त्यांच्यात प्रजननाची कमतरता व वंधत्वाची बाधा आढळते. त्यामुळे जनावरांना रोज एक किलो पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार, व्यवस्थापनात व्यायम, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके, भरपूर पाणी याचे नियोजन आवश्यक आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-‘अमृत संस्थे’ला वालीच नाही का? खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील युवकांच्या उन्नतीसाठी…

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात दुधाळ गाय-म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे गावोगाव वंधत्व निवारण उपक्रम राबविला जाणार आहे. शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाय-म्हशींमध्ये उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी अभियानाला सुरुवात झाली. मोहिमेत गावोगावात गाय-म्हशींची तपासणी व उपचारावर मार्गदर्शन केले जाणार आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी सांगितले.

तपासणीनंतर काही कमतरता आढळल्यास योग्य औषधोपचार आवश्यक असतात. गास-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येऊन गाभण राहिल्यास त्यांच्यातील दोन वेतातील काळ कमी होण्यास मदत होते. गाय- म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढणे, वर्षाला वासरू न मिळणे व खाद्यावरील खर्च होऊन पशुपालकाचे नुकसान होते. त्यामुळे यावर उपाययोजनेसाठी पशुपालकांनी अभियानात जनावरांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले.

आणखी वाचा-हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; आजपासून लक्षवेधी स्वीकारणार

अभियानामध्ये पशुंचा आहार व स्वास्थ्य, तसेच पशुधनाची वंधत्व तपासणी करून निदान करण्यात येणार आहे. जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनावर, तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषधी फवारणी, तसेच गाय-म्हशींमध्ये नियमित कालांतराने जंतनाशकाचा वापर करण्यावर मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.

Story img Loader