अकोला : पारस येथील दुर्घटनेत सात जणांचे बळी गेले, तर अनेक जण जखमी झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस शेजारच्या अमरावती जिल्ह्यात आले. मात्र, त्यांनी अकोला जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त पारस गावाला भेट दिली नाही. ज्यांना पालक शब्दाचा अर्थच कळत नाही, त्या बालकाबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधले.

पारस दुर्घटनेतील जखमींची सावंत यांनी मंगळवारी विचारपूस केली. जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व फळबागाची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘पारस येथे मोठी आपत्ती कोसळली. काही घरे देखील पडली आहेत. राज्य सरकारने त्वरित मदत करायला हवी होती. शिवसेनेने त्यांना मदत केली. जे घडले ते अत्यंत वाईट आहे. मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारी संघटना केवळ शिवसेना आहे. बाकी राजकारण सुरूच राहणार आहे. ज्यांना पालक शब्दाचा अर्थच कळत नाही, त्यांनी बालकांबद्दल कशाला बोलावे.

Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
government schemes Eknath shinde marathi news
सर्वसामान्यांच्या योजना कायम राहणार – मुख्यमंत्री
Opposition leader Vijay Wadettiwar criticism of the Sanjay Rathod plot case Nagpur news
मतांसाठी लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि लाडक्या मंत्र्याला ५०० कोटींचा भूखंड; संजय राठोड भूखंड प्रकरण
Shivaji maharaj statue Nandgaon,
शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकीय विषय नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
Nagpur, narendra modi, vadhvan port grounbreaking, nana patole criticises pm narendra modi,
स्थानिकांचा विरोध डावलून मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमीपूजन, पटोले यांची टीका
Eknath shinde ganesh naik dispute marathi news
१४ गावांवरून नाईक-मुख्यमंत्री वाद?
Kolhapur, Chief Minister Ladki Bahin Samman yojana, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Ladki Bahin scheme, Mahayuti, political propaganda, opposition cr
कोल्हापूरमध्ये शासकीय कार्यक्रमातून महायुतीने प्रचाराच रणशिंग फुंकले

हेही वाचा >>>नागपूरच्या सभेचा वाद न्यायालयाता जाणार

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. पिके आडवी झाली आहेत. फळबागांना मोठा फटका बसला. सर्वसमावेशक विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. हे सरकार केवळ यात्रावर यात्रा करणारे आहे, बाकी काही करणार नाही, अशी टीका खा. सावंत यांनी सरकारवर केली.