अकोला : देशातील १७ कोटी मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. केवळ मत देणारे न राहता मत घेणारे नेतृत्व समाजातून निर्माण झाले पाहिजे. महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवण्याचा निर्धार करा, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केले. ‘एआयएमआयएम’च्यावतीने शहरातील गडंकी मार्गावरील शाह जुलफिकार मैदान येथे रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

या सभेला ‘एआयएमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, विदर्भ प्रदेश अध्यक्ष शाहिद रंगूनवाले, शेख मुस्तफा, जिल्हाध्यक्ष सैयद मोहसीन अली आदी उपस्थित होते.

Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Shashank Ketkar Welcomes Baby Girl
मुलगी झाली हो! शशांक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाला, “घरात लक्ष्मी…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
viral video elederly man playing on a jumping jack video goes viral on social media
“आयुष्य एकदाच मिळते मनसोक्त जगा” जपिंग-जपांगमध्ये आजोबांनी लहान मुलांसारखा घेतला आनंद; प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”

हेही वाचा – “पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार?” नितेश राणेंचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

ओवेसी म्हणाले, भारतातील मुस्लिमांनी आता आपल्या मताचा योग्य वापर करण्याची खरी गरज आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी केवळ १७ कोटी मुस्लिमांची नाही. ती प्रत्येक समुहातील जबाबदार नागरिकांची आहे. मुस्लीम राजकारणाचे बळी ठरत आहेत. मुस्लिमांची १४ टक्के लोकसंख्या असताना लोकसभेत पाच टक्केसुद्धा खासदार नाहीत. भारतीय राजकारणात मुस्लिमांना कुठलेही स्थान नाही, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – ‘कौशल्य विकास’ मधून ३० टक्के रोजगार, ८ वर्षांतील आकडेवारी; देशात ९ वर्षांत १२.३५ लाख तरुणांना  प्रशिक्षण

महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये ५०-६० मुस्लीम आमदार पाहिजे. मात्र, ते का होत नाहीत, याचा विचार करा. राजकारणात केवळ मुस्लिमांच्या मतांचा वापर केला जातो. मुस्लिमांच्या डोक्यात सर्वधर्मसमभावचे विचार पेरण्यात आले आहेत. राजकारणात ते मानू नका, असे आवाहन त्यांनी केले. भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप आमच्यावर करण्यात येत होता; मात्र आरोप करणारेच आज भाजपसोबत चहा पित आहेत, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असून, अजित पवार आज कुठे आहेत? अशी विचारणा करीत आता सांगा कोण आहे भाजपची ‘बी टीम’ असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला. आगामी निवडणुका पक्ष पूर्ण तयारीनी लढवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Story img Loader