छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (२ मार्च) महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेत शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पण ही सभा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली, ती म्हणजे सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाडी मारली. नाना पटोले सभेला गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले होते. खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले.

अखेर नाना पटोले यांनी या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले. “मला दिल्लीत बोलावण्यात आले होते. दिल्लीत आमच्या सूरतच्या दौऱ्याचे नियोजन करायचे होते, म्हणून दिल्लीला होतो. माझी प्रकृती बरी नसल्याचे माध्यमांत सांगण्यात आले. पण, माझी प्रकृती चांगली आहे. माझ्यामुळे दुसऱ्याची प्रकृती खराब होते,” असे नाना पटोलेंनी म्हटले.

revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Kaustubh divegaonkar
आपल्या मुलांच्या मराठीचे काय? असे का म्हणाले सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर?
Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Lodha brothers dispute referred to mediator Court gives five weeks time Mumbai news
लोढा बंधूंचा वाद मध्यस्थांकडे; न्यायालयाकडून पाच आठवड्यांची मुदत
abhishek lodha and abhinandan lodha
व्यापारचिन्हाबाबतचा वाद मध्यस्थांमार्फत सोडवण्यास लोढा बंधुंची सहमती, माजी न्यायमूर्ती रवींद्रन यांची मध्यस्थी म्हणून नियुक्ती
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

हेही वाचा : “राऊत, फाऊत, दाऊद जे असतील, यांना सांगतो…”, मोदींवरील ‘त्या’ विधानावरून फडणवीसांचा राऊतांवर हल्लाबोल

यावरून आता काँग्रेस नेते आशीष देशमुख यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. “नाना पटोले ‘वज्रमूठ’ सभेत गैरहजर होते. त्यानंतर ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, मला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला पाहण्यास मिळतील. जबाबदारीने हे वक्तव्य करतोय,” असे आशीष देशमुख यांनी सांगितले आहे.

“महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष कधी नवीन सरकारच्या प्रमुखांवर बोलताना दिसत नाहीत, पण उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. याचे योग्य ते पुरावे देईन,” असे आशीष देशमुखांनी म्हटले आहे.

हेही वाचा : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण, राजन विचारे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत म्हणाले…

“नागपूरला १६ तारखेला महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्याची कोणतीही जबाबदारी प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली नाही. आमच्या दुसऱ्या नेत्यांवर त्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संभाजीनगरच्या सभेत सूरतच्या मार्गावर असलेले प्रदेशाध्यक्ष १६ तारखेपर्यंत गुवाहाटीच्या मार्गावर असताना दिसतील,” असेही आशीष देशमुख म्हणाले.

Story img Loader