राज्यात २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला होता. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना आमदार बच्चू कडू यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आज अमरावतीत प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – ठाकरे गटाची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्हाला गुंतवून…!”

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

काय म्हणाले बच्चू कडू?

“संजय राऊतांना जेलमध्ये असताना एखादी मातामाय भेटली असेल तिच्याच सांगण्यावरून त्यांनी हे विधान केलं असेल, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी संजय राऊतांना लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या मध्यावधी निवडणुकांच्या दाव्यावरही प्रतिक्रिया दिली. या सर्व भूलथापा आहेत. राहिलेले आमदार फुटून शिंदे गटात जाऊ नये, यासाठी अशी विधाने केली जात आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: “जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांकडे राजीनामा देणं ‘नौटंकी’”, भाजपाच्या टीकेवर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “संभाजी भिडे…”

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी एक मोठं विधान केले होते. “ शिंदे गट आणि भाजपाविरुद्धची लढाई संपलेली नाही. ही न संपणारी लढाई आहे २०२४ पर्यंत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. हे मी आजच्या दिवशी सांगतो आहे आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Story img Loader