नागपूर: अधिवेशनाचे पाच दिवस लोटले आहेत. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी मदतीसाठी सरकारकडे आशेने बघत आहे, अशी माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धिमध्यमांशी बोलतांना दिली.

थोरात पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे लहान कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान वर्षभरही भरून निघू शकणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मदत नको तर भरीव मदतीची गरज आहे.

balasaheb thorat reaction anil bonde remark on rahul gandhi
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
Raj Thackeray post
Raj Thackeray : “आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं…”, राज ठाकरेंची सरकारवर टीका; म्हणाले, “शेतकऱ्यांनाही लाडकं…”
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान

हेही वाचा… “आरक्षणावरून भाजपाने लावलेली आग सामाजिक कलंक…” नाना पटोलेंची टीका; म्हणाले…

राज्यसभेत निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबतचे विधेयक मंजूर झाले आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले की, सरकार सर्वच सहकारी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढवीत आहे. त्याचे परिणाम चुकीचे आहेत. या अधिवेशनानंतर लोकसभेची तयारी सुरू होईल. त्यासाठी सगळ्याच पक्षांच्या बैठक आणि इतर सत्र सुरू होणार असल्याचेही थोरात म्हणाले.