नागपूर : रेल्वेत खाद्यपदार्थ खाल्ल्याने विषबाधांचे प्रमाण वाढत आहेत. या वाढत्या प्रकारांमुळे ‘आयआरसीटीसी’च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लांबच्या प्रवासात रेल्वेगाडी किंवा रेल्वेस्थानकावर उपलब्ध खाद्य घेऊन प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी रेल्वेने या खाद्यपदार्थांबाबत अतिशय सतर्क असणे आवश्यक आहे. परंतु रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवरून प्रवाशांच्या कायमच तक्रारी असतात.

आता तर शिळे किंवा दूषित अन्न प्रवाशांना विकण्याचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या महिन्यात नागपूर स्थानकावरून खरेदी केलेले अन्न खाल्ल्यामुळे ७० हून अधिक प्रवाशांना विषबाधा झाली होती. या प्रकरणाची चौकशी रेल्वेच्या वाणिज्य विभाग आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन केली. यामध्ये आयआरटीसीने खाद्यपदार्थ विक्रीचे (जनआहार) कंत्राट दिलेल्या व्यक्तीने शिळ्या अन्नाची विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आयआरसीटीसीने कंत्राटदाराचा स्टॉल दीड महिना बंद केला आणि नंतर पुन्हा त्याला खाद्यपदार्थ विक्रीची मुभा दिली. अन्नातून विषबाधा होणे अतिशय गंभीर बाब असताना अशाप्रकारे कंत्राटदाराला पुन्हा संधी दिली गेली. यावर भारतीय प्रवासी यात्री केंद्राने आक्षेप घेतला आहे. केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे मंडळ (नवी दिल्ली) यांच्याकडे तक्रार केली असून कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

how to identify whale vomit
व्हेल माशाची उलटी कशी ओळखतात? बाजारात कोट्यवधीत विकल्या जाणार्‍या उलटीचा कशासाठी वापर केला जातो?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
ST employees and officers
बदल्यांमधील गैरप्रकार थांबणार, आता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
tupperware bankrupt
Tupperware bankruptcy: अमेरिकन महिलांमुळे टपरवेअरचे नाव पोहोचले सर्वतोमुखी; त्यामागची गोष्ट जाणून घ्या
Vande Bharat Express Success or Failure Why are some Vande Bharat lying in the dust
विश्लेषण : वंदे भारत एक्सप्रेस यशस्वी की अयशस्वी? काही वंदे भारत धूळखात का पडून आहेत?
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers comment on loksatta news
लोकमानस : पांगुळगाडा काढून घेणे योग्यच!
IIT mumbai
तेल शुद्धीकरण कारखान्यांतून सोडलेल्या पाण्यामध्येच प्रदूषक नष्ट करणारे जीवाणू; आयआयटी मुंबईतील संशोधकांचे संशोधन

आणखी वाचा-बंदूकीची एक गोळी आणि कायमचे अपंगत्व.. काय घडले ?

गेल्या महिन्यात यशवंतपूर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर नागपूर विभागात अवैध खाद्यदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोहीम उघडण्यात आली. कारवाई देखील करण्यात आली. परंतु धक्कादायक बाब म्हणजे ज्या रेल्वेगाडीतील प्रवाशांना विषबाधा झाली त्या प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून खाद्यपदार्थ खरेदी केल्याची बाब समोर आली.

अन्नातून विषबाधा झाल्याची बाब समोर आल्यानंतर चौकशी करण्यात आली. आयआरसीटीकडून जनआहार स्टॉल दीड महिना बंद ठेवण्यात आला. तसेच दंडात्मक कारवाईही करण्यात आली. -अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.