नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. राजकीय नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करते आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

हेही वाचा – “नाथाभाऊ मी असं कधी बोललोच नव्हतो” म्हणत देवेंद्र फडणवीसांनी लग्नाबाबतचा ‘तो’ विषयच मिटवला

Hema Malini
“ती फार मोठी घटना नव्हती”, भाजपा खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर विधान; ३० जणांचा झाला होता मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Pranav Kumar Champion
भाजपाच्या माजी आमदाराकडून काँग्रेस आमदाराच्या घरावर गोळीबार; VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक!
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली

नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

“राज्यात १९९९ ते २०१४ दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. यादरम्यान, एकाही राजकीय नेत्याला अटक झाली नाही. मात्र, भाजपाचे सरकार आल्यानंतर ईडी, इनकम टॅक्स, सीबीआय आणि आता एसआटी सुरू झाली आहे. या राज्यात नेमकं चाललंय काय? आज सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांविरोधात तपास यंत्रणांची चौकशी लावण्यात येत आहे. काही जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, अशी वाईट राजकीय खेळी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

हेही वाचा – “महिलांना मंत्रीमंडळात स्थान द्या” म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आम्ही…”

“अनिल देशमुखांना कारण नसताना १४ महिने जेलमध्ये राहावं लागल. त्यांना आता आयुष्यभर समाजासमोर, कुटुंबियांसमोर, लोकांसमोर, जनतेसमोर आणि स्वत:च्या मनासमोर अपराधी भावनेनं वावरावं लागेल. कोण तो परमवीर सिंग आणि सचिन वाझे? त्यांनी काही तरी हवेत आरोप केले म्हणून एखाद्या मंत्र्यांला अटक करायची का? ही कोणती पद्धत आहे?” असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घाबरू नका, उरलेले आमदार…”, अजित पवारांची शिंदे-फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी

“१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले, मात्र २०२१ साली तुम्हाला नवाब मलिक दाऊदचे हस्तक दिसतात का? तोपर्यंत ते दाऊचे हस्तक होते? हे तुम्हाला माहिती नव्हतं का? आजपर्यंत ज्या लोकांवर तुम्ही ईडीचे छापे टाकले, ज्याच्या संपत्ती तुम्ही जमा केल्या, त्यांच्यावर कितीतरी आरोप लावले. मात्र, ते लोकं जेव्हा तुमच्या बाजुला येऊन बसले तेव्हा स्वच्छ झाले का?” असा प्रश्नही त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला विचारला.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात महात्मा गांधींच्या खुन्याचं उदात्तीकरण” फोटो दाखवत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून शिंदे सरकारवर टीकास्र सोडले. “कायदा सुव्यवस्थेचा विचार केला, तर एनसीआरबीच्या अहवालानुसार गेल्या सहा महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर येतो. राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. याचाच अर्थ राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण किती वाढले आहे, हे लक्षात येईल. तसेच राज्यातील गुन्ह्याचं प्रमाण बघता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. हे अत्यंत चिंताजनक आहे. याचाच अर्थ राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, हे स्पष्ट होतं”, असेही ते म्हणाले.

Story img Loader