भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. चौकशी अंती या प्रकरणात तीन परिचारिकांना दोषी ठरविण्यात आले होते. भंडारा पोलीस ठाण्यात ३०४ या कलम अन्वये या तीन या परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाऐवजी ३०४ (ए) या कलमानुसार आरोप निश्चित केला होता. मात्र या विरोधात प्रमुख परिचारिका ज्योती बारसागडे यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली होती. उच्च न्यायलयाने ही याचिका फेटाळली असून ३०४ (ए) या कलमानुसार आरोप कायम करीत पुढील न्यायालयीन प्रक्रिया चालेल असे आदेश दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा