राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर महाविकासआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशातच आता विजय वडेट्टीवारांनी शरद पवार-अजित पवार भेटीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ते बुधवारी (१६ ऑगस्ट) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार काका-पुतण्या आहेत. त्यामुळे या भेटीनंतर संभ्रम संभ्रम असं म्हणण्याचं काही कारण नाही. शरद पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. काही काळ धीरही धरला पाहिजे. मी या भेटीने संभ्रम निर्माण झाला असं म्हणणार नाही. या भेटीत कुणाची तरी गरज आहे. ही गरज जो भेटायला जातो त्याचीच आहे.”

Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
bharat jodo yatra create unity in society rahul gandhi claim on 2nd anniversary
भारत जोडो यात्रेमुळे समाजात एकजूट; वर्धापन दिनानिमित्त राहुल यांचा दावा
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
Rohit Pawar Nitin Gadkari
रोहित पवारांनी घेतली गडकरींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

“अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर शरद पवारांना…”

“अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर शरद पवारांना सोबत घ्यावं लागेल. शरद पवार सोबत आले नाही, तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नच बघत रहावं लागेल, असं कदाचित भाजपाने म्हटले असेल. हा सत्तेसाठी सुरू असलेला खटाटोप आहे,” असं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : राज ठाकरेंकडून भाजपाची ऑफर आल्याचा दावा; अजित पवार म्हणाले, “असलं काही…”

“विचाराला तिलांजली, केवळ खुर्चीला महत्त्व”

“येथे विचाराला तिलांजली देण्यात आली आहे, विकासाला तिलांजली दिली आहे. येथे केवळ खुर्चीला महत्त्व दिलं आहे हेच या घडामोडींमधून दिसत आहे,” असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपा आणि अजित पवार गटावर सडकून टीका केली..