स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्त आणि समाज सुधारक होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहचायला पाहिजे होते. मात्र, आजही पोहचू शकले नाही. ही खंत व्यक्त करत समितीने त्यांचे कार्य व जीवन समाजापर्यंत पोहचण्यासाठी काम करावे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने देण्यात येणारा स्वा. सावरकर गौरव पुरस्कार माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, शिरीष दामले, सागर मेघे, आमदार समीर मेघे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, सावरकर हे देशभक्त होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे देशासाठी समर्पित होते. ते साहित्यिक आणि समाज सुधारक होते. त्यांचे जीवन समाजातील तळागळातील माणसांपर्यंत पोहचणे आवश्यत होते. मात्र, आजही ते पोहचू शकले नाही. सावरकरांचा विचार पोहचवण्याचे काम समाजातील शेवटच्या माणसापर्यंत समितीने केले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

youths demand seat in Maharashtra Assembly Election
तरुणांना निवडणूक खुणावतेय, मात्र भवितव्य अधांतरी! प्रा. बदखल, डॉ. खुटेमाटे, बंडू धोतरे, डॉ. गावतुरे, ॲड. घोटेकर संधीच्या शोधात
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Yati Narsinghanand
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या यती नरसिंह आनंद सरस्वतींना अखेर पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi on Vinayak Damodar Savarkar
Rahul Gandhi: वीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स; ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश
Congress Leader Statement on Veer Savarkar
Veer Savarkar : “वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे, त्यांनी..” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद
maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
Balasaheb Thorat
महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण हे फडणवीस यांनी ठरवावे’; बाळासाहेब थोरात यांना १८० जागा जिंकण्याचा विश्वास

शंकरनगरातील स्वा. सावरकरांचा पुतळा निर्माण कार्यासाठी जागा मिळवून देण्याचे काम दत्ता मेघे यांनी केले असून त्यात त्यांचे मोेठे योगदान आहे. दत्ता मेघे यांची तुलना ही महाभारतातील दानशूर कर्णासोबत करता येईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. शून्यातून विश्व निर्माण करत त्यांनी समाजातील प्रत्येकासाठी दरवाजे उघडे केले.त्यांनी अनेकांना वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात मदत केली. अनेकांच्या जीवनात त्यांनी आनंद निर्माण केला. अडचणीत असलेल्या लोकांना त्यांनी मदत केली असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी दत्ता मेघे म्हणाले, आयुष्यात जे काही केले आहे ते समाजाप्रती कर्तव्य म्हणून केले आणि त्यात मला आनंद मिळतो. चंद्रकांत लाखे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कुळकर्णी यांनी तर संचालन अनिल देव यांनी केले.

हेही वाचा : सर्वधर्मसमभाव ही हिंदुत्वाची आधारशिला ; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

दत्ता मेेघे यांनी समाजात सामाजिक सेवेत खूप काम केले. मात्र, काही लोक राजकारणात राहून केवळ सत्ताकारण करत असतात आणि समाजकारणाकडे दुर्लक्ष करतात. सत्ताकारण हे अनेकांचे ध्येय असते. दत्ता मेघे यांनी समाजातील तळागळातील लोकांसाठी काम करुन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला आहे. पैसे कमावणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनेकांकडून पैसा निघत नाही. परंतु दत्ता मेघे आणि कुटुंबीयांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला मदत केली असल्याचे गडकरी म्हणाले.