नागपूर : भाजपला नेते घडवता आलेले नाहीत. हा पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांच्या भरवशावर चालत आहे. भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी आहे, अशी प्रखर टीका शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा- पर्व २ ची सुरुवात नागपुरात आज झाली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार प्रहार केला.

व्यासपीठावर सतीश हरडे, नितीन तिवारी, दीपक कापसे, दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कुमेरिया, सुरेश साखरे, शिल्पा बोडखे, प्रमोद मानमोडे, बाळा राऊत, मंगला गवरे, विशाल बरबटे, अपूर्वा चित्तलवार उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवले आहे. त्यांनी इतर पक्षांना फोडून, सरकार पाडून महाराष्ट्र अस्थिर केला आहे. त्यामुळे येथे गुंतवणुकीचा ओघ कमी झाला. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डावपेचाचा भाग म्हणून फडणवीस यांना हुशार, मास्टरमाईंड, चाणक्य ठरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Absence of Shiv Sena Thackeray faction at Vishwajit Kadam rally in Sangli
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गटाची पाठ
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
bjp leader harshvardhan patil marathi news
हर्षवर्धन पाटील यांची महायुतीतील नेत्यांवर नाराजी, इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम; लवकरच निर्णय
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Devendra Fadnavis And Ajit Pawar News
NCP : अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, “देवेंद्र फडणवीस उत्तर द्या”, कुणाची मागणी?
Tension in Koregaon Constituency due to banner tearing
फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदार संघात तणाव, दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

हेही वाचा >>> बनावट जात पडताळणी करून विमुक्त जमातीमध्ये घुसखोरी; आता निघणार ‘ही’ पदयात्रा…

जर ते चाणक्य आहेत तर त्यांनी आजवर कोणता नेता घडवला? ते केवळ तपासयंत्रणांचा धाक दाखवून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना कोणी प्रश्न विचारू नये, असे त्यांना वाटते. ॲड. सतीश उके यांनी फडणवीस यांना निवडणुकीत खोटी माहिती दिल्याबद्दल विचारले म्हणून त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. पकंजा मुंडे यांनी थोडी वेगळी भूमिका मांडली, तर त्यांच्या साखर कारखान्याला कारवाईची धमकी दिली गेली. फडणवीस २०२४ मध्ये मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. हाच संदेश पोहचवण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे, असेही अंधारे म्हणाल्या.