नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्न, महाराष्ट्रातील गुजरातमध्ये गेलेले प्रकल्प, शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या घोटाळ्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. सीमाप्रश्न आणि मंत्र्यांच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी शिंदे आणि भाजपा सरकारला घेतलं होतं. त्यातच आज ( २८ नोव्हेंबर ) विधानपरिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या जोरदार खडाजंगी झाली.

अभिजीत वंजारी यांनी लक्ष्यवेधी मांडताना गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांवरून भाजपाला टोला लगावला. “नुकत्याच गुजरातमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्राचाही सहभाग होता. कारण, महाराष्ट्रातील उद्योग खाताच्या माध्यमाातून प्रकल्प पळवून गुजरातमध्ये नेण्यात आले. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळालं,” अशी टीका अभिजीत वंजारी यांनी केली.

Finance department, Gulabrao Patil,
अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही, गुलाबराव पाटील यांचा कोणावर रोख ?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
BJP Leader Said This Thing About Ajit Pawar
Mahayuti : महायुतीत ठिणगी? “अजित पवारांबरोबरची युती म्हणजे असंगाशी संग, त्यांनाही..”, भाजपा नेत्याचं वक्तव्य
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Antar Singh Aryas appeal to youth says responsibility of youth to save tribals
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
sanjay gaikwad statement on badlapur case
Sanjay Gaikwad : “आता काय मुख्यमंत्री शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का?”, बदलापूर घटनेवरील आरोपाला उत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान!
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…

हेही वाचा : अजित पवारांनी टीईटी घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित करताच देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “अब्दुल सत्तारांच्या मुलीला…”

तेव्हा आमदार प्रसाद लाड यांनी वंजारी यांच्या विधानावर आक्षेप घेतला. यावर वंजारी चांगलेच संतप्त झाले. “तुम्ही नेहरुंबद्दल बोलू शकता. माझा अधिकार नाही का? आम्हाला बोलण्याची संधी द्या, ‘अरे हट’, ‘तुझ्यासारखे बरेच पाहिजे’,” असं अभिजीत वंजारी यांनी प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा : “…अशा बोलघेवड्या लोकांना तंबी द्या”, फडणवीस अमित शाहांना पाठवणार पत्र, म्हणाले “हे पूर्णपणे चुकीचे”

यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांना समज दिली. “प्रसाद लाड तुमची बोलण्याची पद्धत योग्य नाही आहे. सभागृहात मारामारी करायची आहे का?,” असा सवाल नीलम गोऱ्हेंनी उपस्थित केला.