नागपूर: उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार डोळा मारतात. ठाकरे यांचा एवढा अपमान झाला मात्र शिवसैनिकाना काहीच वाटले नाही. मी पण शिवसैनिक होतो पण असा अपमान बाळासाहेब असताना कधी झाला नाही अशी टीका भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केली. नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

देशात आता डोळा मारणारे दोन झाले आहे. एक म्हणजे अजित दादा आणि दुसरे राहुल गांधी असेही बोंडे म्हणाले. विरोधकांना सुदधा या अर्थसंकल्पा बाबत चांगले बोलावे लागत आहे. उध्दव ठाकरे बोलत असताना अजितदादांना डोळा मारावा लागला हे वाईट आहे आणि शिवसैनिकांना काहीच वाटले नाही. अजित पवार शेतकऱ्यांना ६ हजार देणार असल्यावर म्हणाले की घरात ४ लोक असतील तर त्याची रोजी ३ रुपये होणार आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान नाही का?  त्यांचे सरकार असताना शेतकऱ्यांना दमडी तरी दिली का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
Bjp spreading false propaganda against Rahul Gandhi regarding reservation says nana patole
आरक्षणावरील राहुल गांधी यांचे वक्तव्य, पटोले म्हणतात ” भाजप खोटा..”
giriraj Singh Rahul gandhi
“देशद्रोह्यांना आरएसएसची विचारधारा कधीच समजणार नाही”, राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर!
bajrang punia replied to brij bhushan singh
“विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!
Tanaji Sawant and ajit pawar
अजित पवार म्हणाले “तर …माझे पण  कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बोलू शकतात,”
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”

हेही वाचा >>> नागपूर : भाजपचे आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

कोरोना आणि महाविकास आघाडी चा काळ महाराष्ट्राला सुस्त करून टाकणारा होता. मात्र आता अर्थमंत्री फडणवीस यांनी मांडलेला अर्थ संकल्प सगळ्यांना सुख देणारा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठी मांडलेला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांना विरोधात सुद्धा बोलता येत नाही म्हणून ते आता म्हणतात शेतकऱ्याचे वीज बिल वाढणार मात्र तसे काही नाही. आता सोलर ऊर्जा वाढविली जात आहे.