नागपूर: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) झालेल्या गैरप्रकाराची चर्चा देशभर आहे. नीट च्या निकालावरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी , अशी मागणी काँग्रेसने नुकतीच केली होती. त्यानंतर आता देशपातळीवर हा विषय चर्चेला आला आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परीक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वंकश चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमुल्यांकन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा