वाशिम : जालना जिल्ह्यातील लाठीमार घटनेमुळे जालना, संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या अनेक बस फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे वाशिम आगाराला दररोज अंदाजे दोन लाख रुपयांचा प्रत्यक्ष तोटा सहन करावा लागत आहे.

वाशिम आगारातून दररोज जालना, संभाजीनगर मार्गे अनेक बस फेऱ्या धावतात. मात्र जालना येथील लाठीचार्जच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड व जाळपोळ करण्यात आल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी अचानक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
To support hunger strike Dhangar community member climbed mobile tower
बुलढाणा : तब्बल दहा तास टॉवरवर चढून आंदोलन; उडी घेण्याचा…
Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा
peacocks die of electrical shock in bhadravati city
चंद्रपूर : सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

हेही वाचा – कॉमिक बुकच्या माध्यमातून मिळणार मुलांना रंजक शिक्षण

वाशिम आगारातून धावणाऱ्या वाशिम ते शिर्डी, वाशिम पुणे, वाशिम नाशिक, वाशिम सिल्लोड, वाशिम सिडको यासह अनेक बस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाशिम आगाराला दररोज अंदाजे प्रत्यक्ष दोन लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून सवलतीसह अंदाजे चार लाख रुपये तोट्याची झळ सोसावी लागत आहे.

हेही वाचा – “पवार, ठाकरे यांनीच मराठा आरक्षणाला…” चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इतिहास’ सांगितला

अचानक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक बस गाड्या उभ्या आहेत. त्यामुळे बस सेवा कधी सुरू होणार हे अद्याप सांगणे कठीण असल्यामुळे सामान्य प्रवाश्याची कोंडी होत आहे.