चंद्रपूर : देशातील ९० टक्के ओबीसी आणि मागासवर्गीय लोकसंख्येला खरोखरच न्याय द्यायचा असेल, तर देशातील ओबीसींसह सर्व जातींची जनगणना होणे गरजेचे आहे, असे मत प्रख्यात वक्ते व दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. लक्ष्मण यादव यांनी येथे व्यक्त केले. या देशात धर्म आणि जातीच्या नावावर लोकांना भडकवले जात आहे, धर्माच्या नावावर दंगली घडवून आणल्या जात आहेत, शाळांकडे जाणारा जमाव धार्मिक उन्मादाकडे वळवला जात आहे. धर्माच्या नावाखाली काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये तरुणांना सहभागी करून, त्यांच्या हातातून पेन-वही काढून, त्यांना त्रिशूळ, तलवारी देऊन त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. ते म्हणाले की, या देशाला शाळांची गरज आहे, मंदिरांची नाही. न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या बहुजन समता पर्व कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी चर्चासत्रात डॉ.यादव बोलत होते.

डॉ. इसादास भडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्राला मुख्य निमंत्रक डॉ. दिलीप कांबळे, समता पर्वचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, ॲड. बाबा वासाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, ॲड. शंकर सगोरे, माळी समाजाचे राज्य पदाधिकारी अरुण तिखे, ओबीसी नेते सचिन राजूरकर, विनोद थेरे, डॉ.प्रवीण येरमे, डॉ.सिराज खान उपस्थित होते.

Nagpur University, Nagpur University Professor,
फसवणुकीचा आरोपी प्राध्यापक वीस महिन्यांपासून घेतो पूर्ण वेतन, कारवाई शून्य…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Contract teachers, low enrollment schools,
कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक; शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे वादाची चिन्हे
tribal student now get education in dialect conversion
आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर
Opposition party aggressive in Uttar Pradesh over IIT Banaras Hindu University
बलात्कारातील आरोपींच्या सुटकेने गोंधळ; आयआयटीबनारस हिंदू विश्वविद्यालयातील प्रकारावरून उत्तर प्रदेशात विरोधी पक्ष आक्रमक
india student suicide rising
भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं, महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वाधिक तणावात; कारण काय?
Recruitment professors Pune University,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १३३ जागांवर भरती, अर्ज प्रक्रिया कधीपासून?
Sharad Pawar, Sharad Pawar on Educational Expansion in Maharashtra, pune
राज्यातील शिक्षण विस्ताराकडे गांभीर्याने पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन आवश्यक- शरद पवार

हेही वाचा – चंद्रपूर : पोलीस बॅरीकेटला भरधाव दुचाकीची धडक; अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

डॉ. यादव म्हणाले की, मंडल आयोगाने देशातील ३ हजार ७४३ जातींना ओबीसी घोषित करून एका सूत्रात बांधले. देशातील ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्के असूनही या लोकसंख्येला केवळ २७ टक्के आरक्षणाचा लाभ दिला जात आहे. देशात सर्व जातींची मोजणी केली तर सर्व जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळेल. ते म्हणाले की, या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून बोलले जाते, मुस्लिमांपासून धोका असल्याचे सांगून देशाला भडकावले जात आहे, हिंदू राष्ट्र या संकल्पनेला डॉ. आंबेडकरांनी वर्षांपूर्वीच विरोध दर्शवला होता, असे म्हटले होते. असे केल्याने देशाचे स्वातंत्र्य, बंधुत्व आणि समता धोक्यात येईल. जात जनगणनेमुळे देशात जातीवाद वाढण्याची भीती त्यांनी निराधार असल्याचे म्हटले. नवीन शैक्षणिक धोरणालाही त्यांनी अन्यायकारक म्हटले आहे. ते म्हणाले की, देशातील संस्थांचे खाजगीकरण म्हणजे आरक्षण व्यवस्था संपविण्यासारखे आहे. या कार्यक्रमात गजानन गावंडे, शोभा पोटदुखे, आदिंसह ११ मान्यवरांना बहुजनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरुषोत्तम सातपुते, बबनराव फंड, खुशाल तेलंग, नरेन गेडाम, किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, प्रफुल्ल देवगडे, सुभाष शिंदे व डॉ. प्रतिभा वाघमारे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रपूर आयडॉल स्पर्धेची तिसरी फेरी सादर करण्यात आली, तसेच जागर समताचा हा जलसाही विद्या आणि ग्रुपने सादर केला. संचालन प्रलय म्हशाखेत्री, प्रीती उराडे, अशोक बनकर यांनी प्रास्ताविक केले, श्रुतिका जुनघरे यांनी आभार मानले.

हेही वाचा – खासदार अरविंद सावंत यांच्या समोरच ठाकरे गटाचे दोन गट उघड; एका गटासोबत बैठक तर दुसरा बाहेर

भुजबळ आणि आव्हाड आले नाहीत

या कार्यक्रमाला माजी मंत्री व बहुजन नेते छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र ते दोघेही शेवटच्या क्षणापर्यंत हजर न झाल्याने मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांची निराशा झाली.