अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या पाच विभागातील रेल्‍वे सुरक्षा दलाने रेल्‍वे पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ अंतर्गत जानेवारी ते नोव्‍हेंबर या अकरा महिन्‍यांत १ हजार ९९ मुला-मुलींची सुटका केली आहे.आपल्या आई-वडिलांपासून ताटातूट झालेली, घरातून निघून गेलेली, हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना पुन्हा आपले आई-वडील, घर मिळावे यासाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या जवानांनी ७४० मुले आणि ३५९ मुलींची सुटका केली आहे.

त्‍यात मुंबई विभागातून ३७९, भुसावळ विभागातून २४७, पुणे विभागातून २४६, नागपूर विभागातून १६८ आणि सोलापूर विभागातून ५९ मुला-मुलींची सुटा करण्‍यात आली आहे. गेल्‍या वर्षी जानेवारी ते नोव्‍हेंबर या कालावधीत १ हजार ५३ मुला-मुलींना त्‍यांच्‍या घरी पोहचविण्‍यात रेल्‍वे सुरक्षा बलाच्‍या जवानांना यश मिळाले होते.भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर आदींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित सुरक्षा रक्षक बलाच्या जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित कर्मचारी त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सल्ला देतात.

Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा…पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?

ऑपरेशन अमानत

रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, ‘अमानत’ या मोहिमे अंतर्गत रेल्‍वे सुरक्षा दलाने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आणि त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने यासारख्या मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत ५.२२ कोटी रुपये किमतीचे १४९१ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. यापैकी ४३.७२ लाख रुपये किमतीचे सामान एकट्या नोव्हेंबर महिन्यात परत करण्यात आले. मुंबई विभागातून २.५५ कोटी रुपयांचे, भुसावळ विभागातून १.०७ कोटी नागपूर विभागातून ६७.८९ लाख, सोलापूर विभागातून ५१.८६ लाख तर पुणे विभागातून ३९.७३ लाख रुपयांचे सामान परत करण्‍यात आले.

हेही वाचा…अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वेच्या मालमत्तेवरील गुन्हे, हिंसाचार, रेल्‍वेच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचाही सामना करावा लागतो. रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांनी समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत, अशी माहिती रेल्‍वेचे मुख्‍य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्‍वप्निल निला यांनी दिली आहे.

Story img Loader