जगप्रसिद्ध लेखक युवाल नोआ हरारी यांच्या ‘नेक्सस’ या सध्या गाजत असलेल्या पुस्तकातील एक वाक्य आहे. ‘माणूस सत्तेत गेल्यावर हावरट होतो व सत्तेचा गैरवापर करायला लागतो. मूलत: समाज तसा नसतो तरीही तो सत्तेमुळे वाईट झालेल्यांवर ती चालवण्याचा विश्वास वारंवार का टाकतो?’ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नेमके याच प्रश्नाला भिडायचे आहे. त्यात ते यशस्वी होतील की नाही हे येणारा काळ ठरवेल पण आता या नियुक्तीविषयी. ती ज्या दिवशी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात होते. ते म्हणाले ‘काँग्रेसने कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचे म्हणून सपकाळांची निवड केलेली दिसते’ एरवी सरळ वाटणाऱ्या या वाक्यात सत्तेतून आलेला अहंकार दडलाय. कोण हे सपकाळ असा हेटाळणीचा सूर यात आहे. सततच्या विजयामुळे पक्षात निर्माण झालेला आत्मविश्वास व त्यातून झळकणारी आक्रमकता यातून दिसते. यामुळे आपल्यासमोर काय वाढून ठेवले याची कल्पना सपकाळांना दुसऱ्याच दिवशी आली असेल. तसे त्यांचे राजकारण आदर्शवादी. गांधी, विनोबा, गाडगेबाबांच्या विचारावर चालणारे. आजकाल अशा राजकारणाला कुणी हिंग लावूनही विचारत नाही. बुलढाण्यातून सपकाळ हरतात व वादग्रस्त विधाने करणारे वाचाळवीर संजय गायकवाड निवडून येतात यातच सारेकाही आले. समाज, त्यातला मतदार नेमक्या कोणत्या दिशेने झुकलाय? चांगले वा वाईट ठरवण्याची त्याची पद्धत किती बदललेली हेच यातून दिसते. म्हणून सपकाळांसमोरील आव्हान दुहेरी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा