MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Success Story प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर काहीजण यश खेचून आणतात. दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा फाटा या गावातील प्रत्युश विकास दुबे याने तब्बल ८० टक्के गुण मिळवून दहावी परीक्षेत यश मिळवले. आई-वडिलांचे छत्र नसताना जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याच्या या अनोख्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करोनानंतर आजाराने दोन वर्षांआधी प्रत्युशच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर आईने कसाबसा संसाराचा गाडा पुढे ओढला. मात्र, काळाने आईलाही आजारपण दिले. प्रत्युश दहावीला असताना आईचे आजारपण वाढले. मार्च महिन्यात प्रत्युशची दहावीची परीक्षा सुरू असताना आईचे आजारपण वाढल्याने त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

mumbai health department loksatta news
वैद्यकीय अधिकारी २४ वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत, अनेकजण पदोन्नतीशिवायच निवृत्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
archana patil chakurkar marathi news
अर्चना चाकुरकरांच्या प्रश्नामुळे भाजपमधील जुन्या – नव्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
Guillain-Barré Syndrome in Kolkata
‘जीबीएस’चे आता महाराष्ट्राबाहेरही थैमान; कोलकातामध्ये दोन मुलांचा मृत्यू
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा

हेही वाचा : Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: बारावीची कसर भरून काढली! बुलढाणा जिल्हा विभागात तिसरा

मनात आईच्या आजारपणाची चिंता असताना प्रत्युशने तीन पेपर दिले. आणि चौथा पेपर होण्याआधीच आई गेल्याचे वृत्त पुढे आले. आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रत्युशची परीक्षा होती. अशा अवघड परिस्थितीत परीक्षा देणे कठीण होते. डोळ्यात असलेल्या आसवांसह त्याने परीक्षा दिली. घरात वडीलधारी मंडळी कुणीही नाही. धीर द्यायला वडीलांकडचे कुणी नातेवाईक नाही. प्रत्युशच्या आईकडील काही नातेवाईकांनी यावेळी त्याला धीर दिला.

हेही वाचा : Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: यवतमाळमध्ये दहावीतही मुलींचीच बाजी; विभागात चौथ्या स्थानावर, निकाल ९४.५७ टक्के

इतक्या कमी वयात सगळच काही हरवून गेल्याने प्रत्युश प्रचंड दडपणात आला होता. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणता येतो हे त्याने दाखवून दिले. सध्या प्रत्युश आणि त्याची लहान बहिण हे दोघेही आईआजीकडे राहतात. त्यांचा आधार असला तरी भविष्यात शासनाच्या योजनांची मदत घेऊन पुढील शिक्षण करावे अशी त्याची इच्छा आहे. पुढे वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. परिस्थिती खडतर असली तरी आयुष्यात समोर जायचे आहे. आज ज्यांचा आधार आहे त्यांना आपला अभिमान वाटेल असे काहीतरी करण्याचा मानस प्रत्युशने व्यक्त केला.

Story img Loader