चंद्रपूर : मूल तालुक्यातील जानाळा येथील गुराखी गुलाब वेळमे (५०) यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ते ठार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील दोन आठवड्यात तीन गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याने तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे.

मूल तालुक्यातील जानाळा येथून गुलाब वेळमे हा गुराखी जवळच असलेल्या डोनी फाट्याजवळ गायी, बकऱ्या, गुरे चरायला घेऊन गेला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. या घटनेची माहिती वन खात्याला मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

criminal attacked on police with sword and police opened fire
बुलढाणा : गुन्हेगाराचा तलवारीने वार, पोलिसांनी केला गोळीबार!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
man killed in tiger attack, Bhandara District,
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना
Navneet Rana criticize Bacchu kadu,
“बच गयी मैं, तो जला हीं क्‍या…”, नवनीत राणांचे बच्‍चू कडूंवर पुन्हा शरसंधान
India likely to see heavy rainfall in September
“असना” वादळामुळे सप्टेंबर महिना अतिवृष्टीचा..!
mother died Melghat, lack of ambulance Melghat,
अमरावती : रुग्‍णवाहिका वेळेवर न मिळाल्‍याने माता, अर्भकाचा मृत्‍यू; मेळघाटातील दुर्दैवी घटना
Farmers Problem and Bail Pola 2024 Celebration News in Marathi
Bail Pola Festival 2024 : बैलांचा साज महागला, संकटग्रस्त शेतकऱ्यांमुळे पोळ्यावर निराशेचे सावट
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

हेही वाचा…नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान

मूल तालुक्यात वाघाचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेची बाब झाली आहे. वन्य प्राण्यांचे असे हल्ले आम्ही किती सहन करायचे असे गावकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे. माणूस महत्त्वाचा की वाघ अशी ही चर्चा होत आहे. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.