नागपूर : घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही. उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. आतापर्यंत त्यांच्याजवळचे इतके लोक सोडून गेले. त्यावेळी ते काही करू शकले नाही आणि येथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही आणि ती क्षमता त्यांच्याकडे नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> बुलढाणा : निरक्षरांचे सर्वेक्षण सुरू, साडेपाच हजार सर्वेक्षक नियुक्त; निरक्षरांना ऑन व ऑफलाईन शिक्षण देण्याचे नियोजन

Shrikant Pangarkar
Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर दोनच दिवसांत हकालपट्टी; कोण आहे श्रीकांत पांगारकर?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Sharad Pawar Statement About Jayant Patil
Sharad Pawar : जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानानंतर शरद पवारांचं सूचक विधान
Loksatta anvyarth Baba Siddiqui shot and killed Law and order
अन्वयार्थ: कायदा आणि कुव्यवस्था?
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
Narendra Modi Thane, Narendra Modi Ghodbunder,
विकासशत्रू महाविकास आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…

बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्याचा दरारा आणि त्यांच्या कामाचे आम्ही तीस वर्षाचे साक्षी आहे. पक्ष चालविण्यासाठी २४ तासातले अठरा तास काम करावे लागत असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे ती क्षमता नाही. २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे चार ते पाच लोक दिसतील असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेस पक्षाचा इतिहास होता आणि तो आता आता नाही. काँग्रेसला आता भविष्य नाही त्यामुळे ते इतिहासातील काहीतरी काढून पक्ष टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे जहाज डुबत आहे. त्यात कोणी बसणार नाही. त्यामुळे इस्रो नेहरूंनी तयार केला असे ते सांगतात. चंद्रायान तीन तयार करण्यासाठी मात्र मोदींना यावे लागले असेही बावनकुळे म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायद्याचे तज्ज्ञ आहेत, त्यामुळे अपात्र आमदारांबाबत ते योग्य निर्णय घेतील असेही बावनकुळे म्हणाले.