नागपूर : महाराष्ट्रात तीन वर्षांत नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत व्यक्त केला. मुंबई-गोवा महामार्गातील अडथळे दूर करून अनेक वर्षे रखडलेले हे काम लवकरच पूर्ण होईल आणि ठाणे शहर विकास आराखड्याला मंजुरी देण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत कधी निर्णय घेणार, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यावर भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता निश्चितपणे केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद, विदर्भ-मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले सिंचन प्रकल्प, औद्याोगिक प्रकल्प आणि अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.

हेही वाचा >>>महाविकास आघाडी म्हणते…सरकारने शेतकरी, कष्टकरी, तरुण, उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली !

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १३ वर्षे सुरू असून आणखी १० वर्षे लागतील, अशी टिप्पणी शिवसेना (ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी केली होती. या महामार्गाच्या कामात अनेक अडथळे आले. त्यामुळे मी हिमालयातही रस्ते बांधणीचे काम पूर्ण केले, या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही संसदेत सांगितले होते. या महामार्गाचे दोन कंत्राटदार दिवाळखोरीत गेले व अन्यही अनेक अडथळे आले. या प्रकल्पातील अडचणी सोडवून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

ठाणे शहराच्या विकास आराखड्याबाबत सुमारे आठ हजार हरकती-सूचना आल्या आहेत. त्यावर सुनावणी घेऊन नगरविकास विभागाकडून पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

सरकारने अनेक उपाययोजना केल्याने आता नक्षलवाद्यांची नवीन भरती बंद असून छत्तीसगड व ओरिसामध्ये नवीन भरती होत आहे. पण पुढील काळात कठोर कारवाई करून नक्षलवादाचा बीमोड करण्यात येईल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister devendra fadnavis announces that naxalism will be contained within three years nagpur news amy