लोकसत्ता टीम

गडचिरोली : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील मेडीगड्डा धरणावरील पुलाचे काही खांब खचल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली असताना या वादात आता नक्षल्यांनी उडी घेतली आहे. एक पत्रक काढून त्यांनी मुख्यमंत्री ‘केसीआर’ व त्यांच्या कुटुंबियांवर धरण बांधकामात मोठा घोटाळा केल्याचे आरोप केले आहे.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Bhagwant Mann VS Arvind Kejriwal
AAP Politics : केजरीवालांना मोठा धक्का बसणार? ‘भगवंत मान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात’, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने ‘आप’मध्ये खळबळ
Arvind Kejriwal On Delhi Election Result 2025
Arvind Kejriwal : दिल्लीच्या निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाला…”
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
yamuna river poisonous
यमुनेत विष मिसळल्याच्या केजरीवाल यांच्या आरोपाने खळबळ; प्रकरण काय?
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

२१ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास मेडीगड्डा धरणावरील पुलाच्या तीन खांबांना तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे तेलंगणा सरकारने या मार्गावरील वाहतूक बंद करून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला. या घटनेचा शोध घेण्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने महराष्ट्रातील सिरोंचा तालुक्याला याचा फटका बसला. अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेकांची शेती बुडाली, जनावरे वाहून गेली. यामुळे धरणाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर जिल्ह्यात ५२ नवीन तलाठी कार्यालयांची निर्मिती होणार, १८ कोटींचा निधी मंजूर

तेलंगणात सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याविरोधात विरोधकांना आयते कोलीत मिळाले. यात आता नक्षलवाद्यांनी उडी घेतली असून त्यांनी तेलुगुतून एक पत्रक काढले आहे. समाजमाध्यमावर सार्वत्रिक झालेल्या या पत्रकात नक्षल्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या सिंचन प्रकल्पात मोठे कमिशन घेतल्याचेही म्हटले आहे. त्यामुळेच धरण बांधकामावेळेस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माध्यमांना देखील धमकवण्यात आले. आज या बांधकामाला तडे जात असल्याने घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात यामुळे होणाऱ्या नुकसानीला मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव जबाबदार राहतील असेही पत्रकात नमूद आहे.

Story img Loader