चंद्रपूर: “माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे पत्र राज्यातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ३ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना हे पत्र वितरीत केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मुख्यमंत्र्यांच्या या पत्राची चांगलीच चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या या पत्राची सुरूवात प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नव्या दिशेचे, नव्या उषेचे गीत सूर हे गाती, या मंगल देशाचे आहे भविष्य अपुल्या हाती या काव्याने केली आहे. महापुरूषांचा वारसा लाभलेला हा देश कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, बुध्दीवंतांनी आणि विचारवंतांनी घडविला आहे. चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळावरही सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” हे अभियान सुरू केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा